मुख्य सामग्रीवर वगळा

पाच वर्ष नादेंड च्या विकासाला खिळ बसली ना-आशोक चव्हान (रियाज आतार)

पाच वर्ष नादेंड च्या विकासाला खिळ बसली ना-आशोक चव्हान

 विमानतळ ते शासकीय विश्रामगृहाच्या दोन तासाचा प्रवास अभूतपूर्व स्वागत

 नादेंड !  भाजप सरकारने पाच वर्षात नांदेडच्या विकासाला खीळ बसवलेली आहे एकही रुपयाचा निधी जिल्ह्याच्या विकासाला मिळालेला नाही आता जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी माझी भूमिका राहणार आहे त्यामुळे आता नांदेडकरांनी चिंता करण्याचे कारण नाही आसे मत.ना.आशोक चव्हाण याणी व्यक्त केले .

 राज्यमत्रीं मडंळात मंत्री पदाची शपथ घेतल्या नतंर आशोक चव्हान शुक्रवारी प्रथमच नादेंड दौर्यावर आले .ते मुबंई येथून विमानाने नादेंड येथील ,श्री गुरु गोविंदसिघंजी विमान तळावर त्याचें आगमान झाले . यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी करत  अशोक चव्हाण जिंदाबाद अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.  नांदेड विमानतळ ते शासकीय विश्रामगृह असा प्रवास त्यांना दोन तासाचा करावा लागला जागो जागी कार्यकर्त्यांनी
 ना:आशोक चव्हाण याचें स्वागत करण्यासाठी  बँड बाजा सह सज्ज होते.त्याच बरोबर अनेक ठिकाणी चव्हाण यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली  शासकीय विश्रामगृह येथे नियोजित वेळेपेक्षा दीड तास ते उशिरा पोहोचले क्रांती ज्योति सावित्राबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वप्रथम अभिवादन केले त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकार करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित झाले यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की मी  कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व स्वागताने भारावून गेलो आहे  विमानतळ येथे तर प्रचंड गर्दी होती आसे ही ते म्हणाले

 मला कोनाचा बाप करू नका
   काही उत्साही कार्यकर्त्यातून  कार्यक्रम स्थळी जोरदार घोषणाबाजी सुरू होत्या या मध्ये कोण आला रे कोण आला  सर्वांचा बापाला अआहेशा घोषणा दिले जात होते  या घोषनेचा धागा पकडून आशोक चव्हाण  यांनी मला कोणाचा बाप करू नका आमची मुले एवढी खराब नाहीत मी तुमचा थोरला भाऊ म्हणून उभा आहेयावेळी ना. चव्हाण पुढे बोलत आसताना म्हणाले की  मागील पाच वर्षाच्या काळात नादेंड चा विकास खुठंला आहे  जिल्हातील सर्व प्रलिबिंत कामाचा आढावा या तीन दिवसाच्या मुक्कामात मी घेणार आहे .
आगोदर प्रलंबित कामे पुर्ण करुत नतंरच नवीन कामाचा प्रस्ताव हाती घेऊ सर्वाना सोबत घेऊन जिल्हाचा विकास करायचा आहे शुक्रवारी सध्यांंकाळी 8 वाजता महाविकास आघाडिची बैठक बोलविण्यात आली आहे  या बैठकीतून प्रत्येकाने जिल्ह्याच्या विकासाबाबत सुचना कराव्यात
  याच बरोबर पुढील पाच वर्षाचा कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे आता अगोदरच्या सारखे चांगले दिवस अनु अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 याच बरोबर उद्यापासून मी कामाला सुरुवात करणार आहे पाच वर्षात काही झाले नाही केवळ  सरकारने घोषणा केल्या मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही आता संधी मिळाली आहे या संधीचे सोने झाले पाहिजे माझी प्रामाणिक भावना आहे
चागंले काम करणार्याना निश्चचितच सधीं मिळणार

  कार्यकर्त्यांनी आता विनाकारण मुंबईला चक्रामारू नका  जे काही तुमचे कामे असतील  ते कामे सांगा  ते कामे इथेच सोडविले जातील. संघटना बांधणीसाठी काम करा मला निकाल पाहिजे विनाकारण मुंबईला चक्ररा मारू नका  असा सल्ला अशोक चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.  याच बरोबर जिल्ह्यातील येणाऱ्या  सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याच आसतील.  जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती उपसभापती हे सर्व 100% आपलेच असतील याची चिंता करू नका. चांगले काम करणाऱ्यांना योग्य ती संधी देऊ आशी भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली

टिप्पण्या