देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील शाळेत तांदूळ कडधान्याचा,तेलाचा,मुबलक साठा आहे तो शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ ,डाळी ,कडधान्यांचे वाटप विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना करण्यात यावे असा आदेश प्रशासनाच्या वतीने काढण्यात आला होता त्यानुसार राणीसावरगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत वाटप करण्यात आले मात्र सोशल डिस्टेन्सिंगबाबत नियमावलीची काटकोरपणे अंमलबजावणी करताना दिसून आली नाही त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पाल्यांना सोबत घेऊन त्यांच्याकडे तांदूळ व कडधान्य देण्यात यावे असे आदेश असतानाही एकही पाल्य त्याठिकाणी दिसून आला नाही विद्यार्थ्यांना जवळ जवळ थांबऊन वाटप करण्यात येत होते. याबाबत शालेय व्यवस्थापन समिती व तेथील शिक्षक कर्मचाऱ्यांना तेथील शिक्षक कर्मचाऱ्यांना कसल्याच परिस्थितीचे गांभीर्य दिसून येत नव्हते त्याच पद्धतीने सकाळी दूध डेरी व दूध विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनीही सोशल डिस्टेन्सिंगबाबत नियमावलीची काटकोरपणे अंमलबजावणी करताना दिसून आले
नाही
नाही


टिप्पण्या