माझ्या शेतातून जायचं नाही, मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांची शेतकऱ्याने वाट अडवली, अंत्यसंस्कार दिवसभर रखडले
रस्ता नाही म्हणून गरोदर मातेला जीव गमवावा लागला, ही घटना ताजी असतानाच इगतपुरीत शेतातून मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांची शेतकऱ्याने वाट अडवल्याने मृतदेहावरील अंत्यसंस्कार दिवसभर रखडले. नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलीये. शेतातून मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांची शेतकऱ्याने वाट अडवल्याने मृतदेहावरील अंत्यसंस्कार दिवसभर रखडले. इगतपुरी तालुक्यात रस्त्याअभावी गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रस्ता नसल्याने मृतदेहावरील अंत्यसंस्कार करण्यास विलंब झाला. टाके घोटी येथील आदिवासी कातकरी पाड्यावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. त्यामुळे त्या वाडीतील नागरिक एका शेतकर्याचा शेतातील पायवाटेने ये-जा करत असतात. कातकरी पाड्यावरील वस्तीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत न्यायला एकमेव पायवाटेने शेतातून जात असतांना संबंधित मालकाने इथून मृतदेह नेऊ नका असे सांगत मज्जाव केला. म्हणून हा अंत्यविधी दिवसभर रखडला. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर आणि इगतपुरी पोलीस यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस बंद