मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भूमिपुत्रांना गावाकडे पाठवा ; 'या' आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : "शहरात अडकलेल्या भूमिपुत्रांना गावाकडे पाठविण्याची सोय करावी," अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. "पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह राज्याच्या विविध भागातील कष्टकरी  गेले दोन महिने मुंबई व विविध शहरांमध्ये अडकून पडले आहेत. प्रसारमाध्यमांतून टाहो फोडून आपल्याला गावी जायच आहे, अशी हाक मारत आहेत. पण जगभरातील आणि देशभरातील लोकांची आणण्याची सोय करताना महाराष्ट्र सरकारने आपल्याच राज्यातील भूमिपुत्रांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांना तातडीने गावी पाठवण्याची व्यवस्था सरकारने करावी. येत्या आठवड्याभरात सरकारने या संदर्भात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा मुंबईसह राज्यभर रयत क्रांती संघटनेतर्फे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल," असा इशारा आमदार खोत यांनी दिला आहे."शेती परवडत नाही म्हणून शेतकरी कुटुंबातील मुले पुणे, मुंबई व विविध शहरांमध्ये आली. आपल्या कष्टाने त्यांनी शहराच्या आणि राज्याच्या प्रगतीत हातभार लावला. कोरोनामुळे आज ते शहरात अडकले आहेत. खरेतर लॅाकडाउन झाल्यानंतर सरका...

धक्कादायक! लग्न लावाय गेले क्वारंटाईन झाले ; नवरीच कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यामधील मंडीदीपच्या सतलापूनमध्ये एक नवविवाहितेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नववधूला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ माजली आहे. नववधूने लग्नाआधी ताप आला म्हणून कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, लग्नानंतर तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे नववधूला थेट भोपाळच्या एम्समध्ये तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.तसेच लग्नसोहळ्याला उपस्थित असलेले दोन्ही पक्षाकडील कुटुंबीय, पाहुणे आणि लग्न लावणाऱ्या भटजीसह ३२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यामधील ही घटना आहे. हा लग्नसोहळा १८ मे रोजी सतलापूरमध्ये पार पडला. तरही  तरुणी भैपाळच्या जाटखेडीमध्ये राहते.

रेल्वे मंत्रालय महाराष्ट्रावर अन्याय करतंय; सत्यजित तांबे यांचा आरोप

मुंबई  : कर्नाटकमध्ये राज्यांतर्गत रेल्वे वाहतुकीला परवानगी मिळाल्यानंतर रेल्वे महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचा आरोप युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या मागणी इतक्या श्रमिक स्पेशल ट्रेन उपलब्ध करुन दिल्या नाहीत. गुजरातला मात्र महाराष्ट्राच्या तीन ते चार पट ट्रेन उपलब्ध करुन दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवाय महाराष्ट्रात लोकल सुरु करण्याच्या मागणीबाबत रेल्वे काही ठोस भूमिका घेत नाहीय. राज्यांतर्गत रेल्वेही सुरु करत नाही हे सगळं एक षडयंत्रच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज कर्नाटकमध्ये राज्यांतर्गत रेल्वे वाहतुकीला रेल्वे बोर्डानं परवानगी दिली. कर्नाटकमध्ये बंगळुरु ते म्हैसूर, बंगळुरू ते बेळगाव अशा दोन ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारे राज्यांतर्गत ट्रेन सुरु करायला परवानगी मिळालेलं कर्नाटक हे देशातलं पहिलं राज्य ठरतंय. महाराष्ट्रात स्थलांतिरत मजुरांची संख्या सर्वाधिक आहे, अशावेळी महाराष्ट्रातही अशा ट्रेन सुरु होण्याची गरज व्यक्त होत आहे. पंतप्रधानांसोबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत मुंबईत अ...

एखाद्याची पातळी फार खालची असते, तिथपर्यंत आपण जायचं नाही :- जयंत पाटील

मुंबई |  राज्यातील साखर उद्योगांना वाचविण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रानंतर माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या ट्विटरवर मोठे शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. निलेश राणेंकडून अत्यंत टोकाच्या भाषेत होत असलेली टीका लक्षात घेता या वादाला आता वेगळंच वळण लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता रोहित पवारांना ‘हा’ नाद सोडून देण्याचा सल्ला दिला आहे. “एखाद्याची पातळी फार खालची असते. त्या पातळीपर्यंत आपण जायचं नाही. काही वेळाने अशा लोकांचा नादच सोडून द्यायचा”, असा सल्ला जयंत पाटील यांनी रोहित पवारांना दिला आहे. “आपण आपली पातळी किती खाली न्यायची ? हे आपल्यावर आहे. एखाद्याची पातळी फार खालची असते. त्या पातळीपर्यंत आपण जायचं नाही. आपण काही वेळाने अशा लोकांचा नादच सोडून द्यावा. आपणच कुणाच्या किती तोंडाला लागायचं याची एक मर्यादा ठरवायची असते. त्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. रोहित पवार अशांकडे दुर्लक्ष करतील, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे”, अशी प्...

भाजपचा आमदार म्हणून माझ्यावर गुन्हा..

औरंगाबादः लोकप्रतिनिधी म्हणून नागरिक जेव्हा केव्हा संकटात असतील तेव्हा त्याच्या मदतीला धावून जाणे हा जर गुन्हा असेल, तर तो माझ्या हातून वारंवार घडले, मग माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तर मला त्याची पर्वा नाही. जिल्ह्यातील अनेक नेते क्वारंटाईन असलेल्यांना सोबत घेऊन फिरतात, पण त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. पण मी भाजपचा, विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे माझ्यावर मात्र गुन्हा दाखल केला जातो, अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल मत व्यक्त केले.संचारबंदी आदेश असतांना सुरेश धस आष्टी तालुक्यातील कंटोनमेंट झोनमध्ये जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेत होते. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज दुपारी त्यांच्या विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कुणी तरी आपल्या विरोधात प्रतिष्ठा पणाला लावून गुन्हे दाखल करायला लावत असल्याचा आरोप केल्यानंतर धस यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरेश धस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.धस म्हणाले, आधी ऊसतोड मजुरांच्या मदतीला धावून गेलो म्हणून...

परभणीत आणखी एक कोरूना पॉझिटिव्ह एकूण 7 जण कोरोना बाधित

परभणीत आणखी एक कोरूना पॉझिटिव्ह एकूण 7 जण कोरोना बाधित परभणी शहरात पुण्याहून आलेल्या 21 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून प्रशासनाने सदरील राहत असलेला साखला प्‍लॉट परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे पुणे येथील हडपसर भागातील फातिमा नगर भागातील 20 वर्षीय युवक 17 एप्रिल रोजी परभणीत आला त्यानंतर त्याची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेऊन ते नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते याबाबतचा अहवाल मंगळवारी सकाळी प्रशासनास प्राप्त झाला त्यात या युवकाचा अहवाल पॉझिटिव आला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी साखला प्‍लॉट परिसर तातडीने सील करण्याचे आदेश दिले आहेत हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे दरम्यान परभणी आत्तापर्यंत 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यातील एक जण कोरोना मुक्त झाला आहे तर सहा जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता तरी परभणी जिल्ह्यातील जनतेनी त्याचे गांभीर्य ओळखून घरात सुरक्षित राहायला हरकत नाही

भाजपचा प्रस्थापित नेते खडसे, मुंडे यांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी

भाजपतील प्रस्थापित नेते माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे,चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांचे राजकीय पुनर्वसन होणार नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. विधान परिषद निवडणूकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवड समितीने चार उमेदवारांच्या नावाची घोषणा आज केली असून,प्रविण दटके,गोपीचंद पडळकर,अजित गोपछडे,रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे.विधान परिषदेला डावलल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होत आहे. यासाठी भाजपकडून चार उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील,धनगर समाजाचे नेते आणि अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविलेले गोपीचंद पडळकर,नागपूरचे माजी महापौर प्रविण दटके आणि भाजपचे कार्यकर्ते अजित गोपछेडे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.या निवडणूकीसाठी भाजपकडून माजी मंत्री एकनाथ खडसे,पंकजा मुंडे,चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा होती मात्र या चारही नेत्यांना डावलण्यात आ...

“जनता विरोध करते त्याला ट्रोलिंग समजू नका”, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला

जनता विरोध करत असेल तर त्याला ट्रोलिंग समजू नका असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला आहे. भाजपा नेत्यांनी शनिवारी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच पक्षाला ट्रोल करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी आपल्या एखाद्या वक्तव्याचा लोकांकडून विरोध होत असेल तर त्याला ट्रोलिंग समजू नका असा टोला लगावला आहे.जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, “करोनासारखं गंभीर संकट असतानाही भाजपा नेते राजकारण करत होते. त्यामुळे लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली आहे. लोक आपल्या वक्तव्याचा निषेध करत असेल तर त्याला ट्रोलिंग समजू नका”. जयंत पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या फोटोंसोबत छेडछाड करण्यात आली होती. त्यावेळी आम्ही तक्रार करण्यासाठी गेलो असता त्याची दखलही घेतली गेली नव्हती असं सांगितलं.“निवडणुकीत काही फेसबुक पेजच्या माध्यमातून अत्यंत खालच्या पातळीवरील टीका केली जात होती. यासाठी त्यांना पैसे कोण पुरवत होतं,” अ...

औरंगाबादमध्ये दारुची दुकानं उघडल्यास महिलांसह रस्त्यावर उतरु, खासदार इम्तियाज जलील आक्रमक

औरंगाबाद : औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यात मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास विरोध केला आहे. ‘रेड झोन’ असतानाही दारुची दुकाने उघडल्यास लॉकडाऊन तोडून ती बंद करायला भाग पाडू, महिलांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करु, असा इशारा जलील यांनी दिला आहे.रेड झोनमध्येही दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जर औरंगाबादमधील दुकाने उघडली, तर आम्ही लॉकडाऊनचे सर्व नियम तोडू आणि ही दुकाने जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडू. आम्ही बर्‍याच महिलांना रस्त्यावर येण्यास सांगू. दारु विक्री करुन आपल्या माता-भगिनींसाठी समस्या निर्माण करण्याची ही वेळ नाही.’ असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन दिला आहे. ‘कोरोना’च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे औरंगाबाद जिल्हा ‘रेड झोन’मध्ये येतो.निम्न वर्गातील स्त्रियांसाठी ही दारुची दुकानं मोठी समस्या आहे, त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. माझ्या मोलकरणीचा नवरा दारुच्या नशेत घरी आल्यावर रोज तिला मारहाण करतो. या कठीण काळात दारु विक्री करण्याची इतकी घाई का आहे? मग सर्वच दुकानं सुरु करा ना, केवळ दारुच्या दुकानांनाच ही विशेष सूट का?’ असा प्रश्नही जलील...

व्हिडिओचा संबंध मशिदीची जोडल्यामुळे अर्बन गोस्वामी विरोधात गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक आणि मालक अर्बन गोस्वामी यांच्या विरोधात पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .  मुस्लिम समुदायाबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करण्यावरून देशभरातून 110 हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या त्यानंतर अर्बन यांनी त्यांच्यावर आणि पत्नीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल केली सुप्रीम कोर्टाकडून तीन आठवडे कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले होते शनिवारी पुन्हा अर्बन विरोधात गुन्हा दाखल झाला आहे यासाठी रिपब्लिक भारत चैनल चे बांद्रा स्थानकाजवळील स्थलांतरित कामगारांच्या जमावाचा व्हिडिओ 29 एप्रिल रोजी कार्यक्रमात वापरला होता अर्बन स्वतः त्यात अँकरिंग करत होता त्यामुळे शेख यांनी अर्बन यांच्या शो मधील मुस्लिम समुदायावर द्वेष पसरवणाऱ्या काही वाक्यांचा संदर्भ या तक्रारी दिलाय अब से थोडी देर पहले बांद्रा में जामा मस्जिद है और इस जामा मस्जिद के पास अचानक हजार...

मुस्लीम व्यापाऱ्यांना गावात प्रवेश नाही !

सध्या संपूर्ण देश करोना विषाणूचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत सर्व जनतेने अधिकाधिक वेळ घरात राहून पोलीस व अन्य अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना मदत करावी असं आवाहन केंद्र सरकार करत आहे. ज्या भागांमध्ये परिस्थिती हळूहळू सुधारत आहे त्या भागांत केंद्र सरकार अटी व शर्थींसह उद्योगधंदे सुरु करण्यासाठी परवानगी देत आहे. मात्र देशातील काही भागात आजही जात आणि धर्मावरुन भेदभावाच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात भाजप आमदारांनी मुस्लीम व्यक्तीकडून भाजी खरेदी करु नका असं जाहीर आवाहन करत त्याचं समर्थनही केलं होतं. यानंतर मध्य प्रदेशातील पेलमपूर गावात मुस्लीम व्यापाऱ्यांना गावात प्रवेश नाही असं पोस्टर झळकलं आहे.सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षातील काँग्रेस नेत्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.इंदूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी इंडियन एक्स्प्रेसला अधिक माहिती दिली. या पोस्टरची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत हे पोस्टर हटवलं आहे. हे पोस्टर लाव...

मदत करावी तर सय्यद अल्ताफ यांच्या सारखी...ना फोटो ना तामझम..!

लॉकडाऊनचा परिणाम सर्वसामान्य गोरगरीबांच्या जीवनावर प्रचंड झाला आहे. या विदारक परिस्थितीत देणाऱ्यांचे हजारो हात समोर आले आहेत.मात्र फोटो, व्हिडीओ बनवून त्याचे राजकारण करत आहेत राणीसावरगाव परिसरातील जनतेला कोणतीच मदत मिळाली नाही .दोन जणांनी काही लोकांना धान्य दिलं पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गंगाखेड तालुका उपाध्यक्ष सय्यद अल्ताफ यांनी धान्याच्या तब्बल 200 किटचे वाटप केले आहे.मात्र त्यांनी कोणताही बडेजाव पणा न करता धान्याच्या किट कोणी दिल्या हे ही त्या कुटुंबाला माहिती नाही आणि फोटो ,व्हिडीओ बनवणं तर दूरच म्हणावं लागेल  सध्या लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या अनेक कटूंबासमोर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. घरातील कर्ता माणुसच घराच्या बाहेर पडू शकत नसल्याने घरात पैसा कसा येणार, हा प्रश्न रोजच्या कमाई करणाऱ्यासमोर उभा राहिला आहे. घरात पैसा नसल्याने धान्य आणने आवघड आहे. याची दखल घेत सय्यद अल्ताफ यांनी तातडीने धान्याची व्यवस्था केली. अल्पावधीतच किराणा सामानाची यादी तयार करून किमान 15 ते 20 दिवस पुरेल इतके धान्य व आवश्यक किराणा साहित्याची किट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. ...

चिंताजनक ती कोरोनाग्रस्त महिला नांदेडच्या रहमतनगर मधील

*#चिंताजनक | ती कोरोनाग्रस्त महिला नांदेडच्या रहमतनगर भागातील.  रहेमतनगर परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू   शहरातील चौथा 'कंटोंमेंट झोन ' जाहीर! नांदेडात कोरोनाग्रस्तांची  एकूण संख्या 29 वर.2 मृत्यू #नांदेड_दि 3 मे | पिरबुऱ्हाणनगर भागातील त्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला कोणामुळे कोरोनाची लागण झाली, हा प्रश्न आजही अनुत्तीर्ण आहे. असे असतांना देगलूरनाका भागातील रहमतनगर येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान रहेमतनगर परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू असून हा परिसर  शहरातील चौथा 'कंटोंमेंट झोन ' होणार आहे. रहेमतनगर येथील ही महिला काही दिवसांपूर्वी डॉक्टर लेन भागातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. उपचार सुरू असताना तिला श्वास घेण्यास त्रास होत होत होता आणि दमही लागत होता. त्या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते असे सांगितले जात आहे. त्या ठिकाणी त्या महिलेचे स्वाब घेतले असता त्याचा अहवाल आज पॉझीटिव्ह आल्याचे सांगण्यात येते...