मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठा नव्हे, ते कुणबीच; मागास आयोग

मुंबई: मराठा व कुणबी एक असून ते एकाच समाजातील आहेत. कुणबी समाजाला यापूर्वीच इतर मागास प्रवर्गामध्ये (ओबीसी) समाविष्ट करण्यात आले आहे. त्याआधारे मराठा समाजालाही यापूर्वीच ओबीसीमध्ये समाविष्ट करायला हवे होते, असे मागास प्रवर्ग आयोगाने अहवालात नमूद केले आहे.मराठा समाज आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मागास आहे की नाही, याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील आठ सदस्यीय समिती नेमली. समितीने नोव्हेंबर २०१८ मध्ये मराठा समाजाबद्दलचा अहवाल राज्य सरकारपुढे सादर केला. या अहवालाचा आधार घेत राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला व तसा कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्याच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सोमवारच्या सुनावणीत न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना व सर्व प्रतिवाद्यांना अहवालाची सीडी देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. त्यानुसार सरकारने मंगळवारी सर्व याचिकाकर्ते प्रतिवाद्यांना अहवालाची सीडी...

सेलू तालुक्यातील रायपूर एक गाव... यशोगाथा

#रायपूर_एक_गाव.. जैसे जैसे सहकार्य वाढे।   तैसे गाव उन्नतीस चढे।    सेलू या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर असणारं,खडतर रस्त्याचं आणि आडवळणावर असणारं गाव म्हणजे रायपूर. या गावाचा रस्ता खडतर असला तरी,हे गाव सर्वांना आपले आणि प्रिय वाटते कारण, या गावातील माणसे खूप मृदू स्वभावाची आणि चांगल्या वळणाची आहेत.यामुळेच या गावाचा प्रत्येकाला लळा लागतो आणि तो गावाशी एकरूप होऊन जातो.       या गावात सर्व धर्माची,जातीची लोक गुण्यागोविंदाने राहून,शांततामय वातावरण स्वीकारतात.एकमेकांच्या मताचा आदर करत आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करत राहतात.       या गावाची सर्वांसाठी अनुकरणीय एक बाब आहे आणि ती म्हणजे गावाची एकता.रायपूर मध्ये जरी करता महाराष्ट्रात असणाऱ्या सर्वच राजकीय पक्ष्यांचे नेते किंवा कार्यकर्ते असले तरी,गावात एखादेवेळी घडणाऱ्या किंवा घडलेल्या सुख दुःखाच्या प्रसंगी सर्वच लोक तत्परतेने एकत्र येतात.आणि आलेल्या समस्येवर,प्रसंगावर प्रसंगावधान राखून तोडगा काढून पीडित व्यक्तीस,कुटुंबास सामाजिक, मानसिक व आर्थिक आधार देऊन खंबीरपणे स...

अहमदपुर तालुक्यात शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थ्यांनीवर बलात्कार

लातूर : शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार लातूर जिल्ह्यात घडला आहे. लातूर जिल्ह्यातील किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढालेगाव येथील एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे.या घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधम शिक्षकास अटक केली आहे. पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर अहमदपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.ढालेगाव येथील एका आश्रम शाळेतील नराधम शिक्षक गणेश बोबडे याने याच शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. मागील अनेक दिवसांपासून हा नराधम शिक्षक या मुलीवर अत्याचार करत होता.शिक्षक सतत अत्याचार करु लागल्यानंतर पीडित मुलीने तिच्या नातेवाईकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. ही गोष्ट जेव्हा गावात सर्वांना समजली तेव्हा लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी याप्रकरणी किनगाव पोलिसांत तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी ताबडतोब त्या नराधम शिक्षकास अटक केली आहे. पीडित मुलीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

"हिंदूंच्या मुलींना स्पर्श करणारे हात उखडून फेका" :-केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेडगे

कोडागू- वादग्रस्त विधानासाठी चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. जर कोणी हिंदू मुलीला स्पर्श केला, तर त्याचे हात मुळापासून उखडून फेका, असं विधान केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलं. कर्नाटकातल्या कोडागूमध्ये एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं.केंद्रीय मंत्री रॅलीला संबोधित करताना म्हणाले, जो हिंदूंच्या मुलींना स्पर्श करेल, त्याचे हात तोडून टाका, इतिहास अशाच प्रकारे लिहिला जातो आणि जेव्हा तुम्ही इतिहास लिहाल तेव्हा तुमच्यात एक प्रकारची हिंमत येते. तुम्ही इतिहास वाचल्यास भीती निर्माण होते. आता आपणच ठरवावं तुम्हाला इतिहास लिहायचा की वाचायचाय ?, जातीसंदर्भात विचार न करता आजूबाजूच्या परिस्थितीचा आपण विचार केला पाहिजे, असंही अनंत कुमार हेगडे म्हणाले आहेत. तसेच ताजमहाल हे मुस्लिमांनी तयार केलेलं नाही. शाहजहाँनं ताजमहाल हा राजा जय सिंह यांच्याकडून विकत घेतला होता. ताजमहाल एक शिव मंदिर आहे, ज्याचं निर्माण राजा परमतीर्थ यांनी केलं होतं.ताजमहालचं पहिलं नाव तेजो महालय होतं. त्याचं नंतर ताजमहाल असं नामकरण करण्यात आलं. टीपू ...

पेनूर येथे शिवसंकल्प प्रतिष्ठाण तर्फे यात्रेकरुसाठी मोफत मिनरल वाटप

शिवसंकल्प प्रतिष्ठाण तर्फे यात्रेकरुसाठी मोफत मिनरल वाटप कै.लक्ष्मणराव एजगे यांच्या स्मरणात सामाजिक कार्यकर्ते मारोती एजगे यांचा स्तुत्य उपक्रम पेनूर.... प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पेनूर येथील हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेले श्री सय्यद बाबा यात्रेनिमित्त शिवसंकल्प प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मारोती एजगे यांचे वडील कै.लक्ष्मणराव एजगे यांच्या स्मरणात मोफत मिनरल वाटरचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ नागरीक माधवअप्पा कंधारकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ.अशोकराव पा.गवते.यावेळी शिवसेना नेते मुक्तेश्वरराव धोंडगे,तिरूपती घोरबांड,पांगरीचे माजी.सरपंच राम पा.पांगरीकर, सोनखेड पोलीस स्टेशनचे बिट जमादार गुरु कारामुंगे साहेब,जाधव साहेब,साखरे साहेब,फुलवळ ग्राम पंचायतचे सरपंच धोंडिबा मंगनाळे,छत्रपती शिवाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवाजी हंबर्डे,छोटा बालक चि.विघ्णेश एजगे,सामाजिक कार्यकर्ते मारोती कांबळे,पत्रकार विरभद्र एजगे,बालाजी ढेपे,बाळाजी आव्हाड यांची उपस्थिती होती. पेनूर परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले शिवसंकल्प प्रतिष्ठाणचे अध्यक्ष...

'भारत माता की जय' म्हटल्याने देशभक्ती सिद्ध होत नाही; कोणी काढला फतवा

लखनऊ: वादग्रस्त नियम आणि फतव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दारूल उलुम देवबंद या संस्थेने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवा फतवा जारी करून वादाला तोंड फोडले आहे. यामध्ये प्रजासत्ताक दिनाला 'भारत माता की जय' ही घोषणा किंवा 'वंदे मातरम्' हे गीत गाण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. यामुळे देशभक्ती सिद्ध होत नसल्याचेही या फतव्यात म्हटले आहे. या फतव्याववरून वादाला तोंड फुटले आहे. 'भारत माता की जय' घोषणा देणे इस्लामविरोधी आहे. इस्लाम धर्मात केवळ अल्लाची प्रार्थना केली जाते. 'भारत माता की जय' बोलताना तुमच्या डोळ्यांसमोर विशिष्ट प्रतिमा येते. त्यामुळेच मुस्लिमांनी ही घोषणा देता कामा नये. त्याऐवजी मुस्लिमांनी 'हिंदुस्तान जिंदाबाद' अशा घोषणा द्याव्यात. त्यामुळे आपल्यातील देशभक्ती जिवंत राहील, असे जामिया हुसैनिया मदरसाचे मुफ्ती तारिक कासमी यांनी म्हटले. 

साताऱ्यात मुलीची गळा चिरून हत्या

सातारा, (प्रतिनिधी ):  महाविद्यालयीन युवतीचा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. साताऱ्यातील करपेवाडी गावातील ही धक्कादायक घटना घडली आहे. भाग्यश्री माने असं खून झालेल्या मुलीचं नाव आहे.भाग्यश्री माने या 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची मंगळवारी हत्या करण्यात आली. आरोपीनी नराधमाने भाग्यश्रीचा गळा चिरून शीर धडावेगळं केलं आणि तिचा मृतदेह उसाची शेत असणाऱ्या बाधांवर फेकून दिला. या क्रूर हत्याकांडाने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.भाग्यश्रीची हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली याबाबत अजून माहिती मिळाली नाही. हत्येची घटना समोर आल्यानंतर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत आरोपींचा शोध लागू शकलेला नाही. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.दरम्यान, महाविद्यालयीन युवतीची इतक्या क्रूरपणे केलेल्या हत्येची घटना माहिती समोर आल्यानंतर करपेवाडी गावात संताप पसरला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी भाग्यश्रीचे नातेवाईक करत आहेत.

यूपी पूर्वच्या काँग्रेस प्रभारी म्हणून प्रियांका गांधींची नियुक्ती

नवी दिल्ली :  आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मोठा बदल केला आहे. प्रियांका गांधी यांनी राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज प्रियांका गांधींना काँग्रेस सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. तसंच प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पूर्वची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश पश्चिमचं नेतृत्त्व ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रियांका गांधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कार्यभार स्वीकारणार आहेत. या निर्णयामुळे इतके दिवस पडद्यामागे काम करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पहिल्यांदाच संघटनेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. तसंच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची यावेळी निवडणूक लढण्याची शक्यता कमी असल्याने प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अशीही चर्चा रंगू लागली आहे

हॅकिंग केवळ काँग्रेसकडून राजकीय स्टंट : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली :  ईव्हीएम हॅकिंगबाबत लंडनमध्ये काँग्रेसने केवळ राजकीय स्टंट केला. भारतीय लोकशाही आणि निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा या स्टंटचा उद्देश होता, असा पलटवार भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला. भाजपने ईव्हीएम हॅक करुन 2014 साली विजय मिळवला, असा दावा अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सय्यद शुजाने (Syed Shuja) केल्यानंतर, देशभरात खळबळ उडाली आहे. त्या दाव्यावर आज भाजपकडून पत्रकार परिषद घेऊन पलटवार करण्यात आला

निमंत्रण पत्रिकेत मेटेंचं नाव नसल्यानं डॉक्टरला मारहाण

बीड : बीडमध्ये शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याने डॉक्टरला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटेचं नाव कार्यक्रम पत्रिकेत टाकलं नसल्यानं कार्यकर्त्याने दादागिरी करत डॉक्टरला मारहाण केली.राहुल आघाव असं मारहाण करणाऱ्या शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. डॉक्टर सोमनाथ पाखरे यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि आमदार जयदत्त क्षीरसागर येणार होते. मात्र या उद्घाटनासाठीच्या पत्रिकेत डॉ. पाखरेंनी विनायक मेटेंचं नाव टाकलं नव्हतं.यामुळे संतापलेल्या राहुल आघावने विनायक मेटेंचं नाव पत्रिकेत का नाही टाकलं याचा जाब पाखरेंना विचारत त्यांना बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे राहुल आघावने डॉ. पाखरेंना केलेली मारहाण सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ज्यामध्ये तब्बल दहा मिनिटे राहुल आघावने सोमनाथ पाखरे यांना मारहाण केल्याचं दिसून येत आहे. राहुल आघाव दारुच्या नशेत असल्याची माहिती डॉ. पाखरेंनी दिली.

संजय काकडे काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवणार..!अशोक चव्हाण यांची भेट

पुणे:  भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची भेट झाली. या भेटीनंतर  पुण्यातील लोकसभा मतदारसंघाचं  चित्र बदलण्याची शक्यता आहे. कारण संजय काकडे हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून, काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. पुण्यातून लोकसभेसाठी संजय काकडे इच्छुक आहेत. याआधी काकडे यांनी सहयोगी भाजपवर अनेकदा तोंडसुख घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर हे भेट महत्वाची मानली जात आहे. संजय काकडे काँग्रेसकडून पुण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुणे मतदारसंघासाठी आग्रह धरला होता. राष्ट्रवादीही संजय काकडेंना उमेदवारी देण्याच्या तयारीत होती. मात्र हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने, संजय काकडे काँग्रेसच्या संपर्कात आहेत. काकडे यांनाच काँग्रेसकडून लोकसभेचं तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. एका कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी ही भेट झाली. काकडे आधीपासून काँग्रेसच्या संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. असं असलं तरी स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून काकडेंच्या उमेदवारीला विरोध आहे. मूळ काँग्रेसच...

जमिनी घेता तर मोबदला पण द्या अन्यथा मरेपर्यंत उपोषण

औरंगाबाद: यावेळी सुनील धात्रक, सोपान जाधव, बाबासाहेब बोडखे, चरणसिंग जुनी, उषा चितळे, बाबासाहेब चितळे, बाळासाहेब तळेकर, बळीराम तांबारे, शांताबाई कुंडलवाल, मिर्झा एकबाल बेग, मिर्झा इस्माईल बेग, शेख महेमुद शेख लाल, जावेद शेख, बब्बु शेख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) औरंगाबाद- धुळे महामार्गासाठी भुसंपादन झालेल्या प्लॉट धारकांना मोबदला मिळाला नाही म्हणुन गट नं.२२५/६ , कोहीनूर पार्क, मौजे तिसगांव येथील बाधीत लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. महामार्ग क्र.२११ साठी भूसंपादन झालेल्या प्लॉट धारकांनी वेळोवेळी भुसंपादन अधिकारी, उपअधिक्षक भुमी अभिलेख यांच्या कडे रजिस्ट्री ची छायांकित प्रत आवक जावक विभागात दिली आहे. संजय शिवनारायण शर्मा यांचेकडून प्लॉट खरीदी करून अनेक वर्ष वर्षे झालेली आहे. गरीब मोलमजूरी करणा-यांनी पोटाला चिमटा देवून घर बणवण्यासाठी हे प्लॉट खरेदी केले असताना ही जागा महामार्गासाठी भूसंपादीत झाली आहे. मोबदल मिळावा यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने शासनाला मोबदला देण्याचे आदेश दिल्यानंतरही संबंधितांना मोबदला मिळाला नाही म्हणून प्लॉट धारकांवर...

राजश्रीताई जामगे यांच्या हस्ते काहूर’ फॅमिली डॉक्टर दिनदर्शिका-2019 चे प्रकाशन

‘काहूर’ फॅमिली डॉक्टर दिनदर्शिका-2019 चे प्रकाशन विशेषांकाचा बादशाह...‘काहूर’ प्रकाशनाची आणखी एक दिनदर्शिका फॅमिली डॉक्टर-2019 चे प्रकाशन डीवायएसपी श्री. सुधाकर रेड्डी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक हेमंत मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दीनानाथ फुलवाडकर, सुप्रसिद्ध डॉ. के.पी. गारोळे, पोलीस निरिक्षक श्री. सोहन माछरे, केंद्र, राज्य सरकार योजना व्यक्तिगत लाभार्थी परभणी लोकसभा संपर्क प्रमुख सौ. राजश्रीताई बाबासाहेब जामगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. सुरेश थोरात, गंगाखेड लॉयन्स क्लब टाऊनचे अध्यक्ष लॉ. दगडूशेठ सोमाणी, लॉ. केशव देशमुख, दै. लोकमत प्रमिनिधी अन्वर लिंबेकर, सामाजिक कार्यकर्ते नंदू सोमाणी, पत्रकार भीमराव कांबळे, एन.टीव्हीचे प्रतिनिधी अंकुश कांबळे, महासंवाद महामुने, पत्रकार माऊली जाधव, बालासाहेब कदम, ‘काहूर’चे संपादक शंकर इंगळे आदींची उपस्थिती होती. काहूर प्रकाशनाने वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन संग्राह्य, दर्जेदार विशेषांक वाचकांसमोर ठेवल्या बद्धल संपादक शंकर इंगळे यांचा सत्कार गंगाखेड लॉयन्य क्लब टाऊनचे अध्यक्ष दगडूशेठ सोमाणी, लॉ. केशव देश...

रत्नाकर गुट्टे विरोधात गुन्हा; पत्नीनेच दिली फिर्याद

परळी वैजनाथ : गंगाखेड येथील गंगाखेड शुगर फॅक्टरीचे चेअरमन व उद्योजक तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. शारीरिक, मानसिक छळ करत असल्याची फिर्याद पत्नी सुदामती गुट्टे यांनी दिल्यावरुन त्यांच्यासह इतर सात जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.रत्नाकर गुट्टे मागील काही दिवसांपासून घटस्फोट मागत आहेत, तसेच मद्यपान करुन शिव्या व इतर आरोपही पत्नी सुदामती गुट्टे यांनी फिर्यादीत नमूद केले आहेत. रात्री-अपरात्री परस्त्रीयांना घरी घेऊन येतात, मला घराबाहेर काढण्याची धमकी देत ‘तू मला पसंत नाही,’ असं म्हणून दाबदडप करतात. दीरासह नवरा आणि अन्य आपल्याला पिस्तुलाचा धाक दाखवून तुला मारुन टाकू अशी धमकी देतात यासह अन्य गंभीर स्वरुपाची लेखी तक्रार पोलिसात दिलेली आहे. त्यांच्या छळाला इतरांचे पाठबळ असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन रत्नाकर गुट्टे यांच्या छळाला त्यांच्यासह इतरांचे पाठबळ असल्याचेही नमूद केल्यावरुन रत्नाकर गुट्टे, अंकुश गुट्टे, सुंदराबाई गुट्टे, कल्पना गुट्टे, सिताबाई, मुंडे, विष्णू मुंडे, संजय मुंडे आदींवर शुक्रवारी रात्री उशिरा...

राणीसावरगावात दर्पण दिनानिमित्य पत्रकारांचा सत्कार

श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरी इंग्लिश स्कूल व उच्चप्राथमिक -माध्यमिक विद्यालय  राणीसावरगाव येथे बाळ शास्त्री जांभेकर दर्पण दिनानिमित्य पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात दिनांक 7  जानेवारी वार सोमवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर ,सावित्रीबाई फुले व सानेगुरुजी यांच्या संयुक्तिक जयंती महोत्सवानिमित्य विद्यालयामध्ये माऊली हॉस्पिटलचे संचालक डॉ.परशुराम शिंदे साहेब व शाळेच्या वतीने  निबंध स्पर्धा वक्तृत स्पर्धा ठेवण्यात आली होती त्याचे बक्षीस वितरण, नवनिर्वाचित सरपंच सुरेशभाऊ चव्हाण,घनदाट मामा मित्रमंडळाचे जिल्हा परिषद सर्कल प्रमुख कल्याण भाऊ जाधव, माजी सरपंच हंसराज जाधव, सामाजिक कार्यकर्ते किशन वळसंगीकर व पत्रकार  माऊली जाधव  रमेश महामुने सुरेश सालमोठे यांना विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ शामची आई हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आली. यावेळी  माऊली हॉस्पिटल चे डॉ. शिंदे यांनी आई हे पाल्याची पहिली गुरु आहे आणि आई वडिलांनी संपत्ती पेक्षा संतती संस्कारक्षम  होण्यासाठी लक्ष पुरवावे या...

गेटला कुलूप लावून मुख्याध्यापकासह सात शिक्षकांनी शाळेला मारली दांडी

मुख्याध्यापकासह 7 शिक्षकांनी शाळेला मारली दांडी मुख्याध्यापकावर कार्यवाही करा :-शालेय व्यवस्थापण समिती  अध्यक्षाची मागणी राणीसावरगाव (प्रतिनिधी) तेथुन जवळच असलेल्या मौजे घंटाग्रा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ही दि.5 जानेवारी रोजी सकाळ पासून बंद ठेऊन मुख्याध्यापकासह शाळेचे कर्मचारी शाळेकडे फिरकलेच नसून त्यानी शाळेला दांडी मारल्याचा प्रकार उघडकीस आणल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे  याबाबत सविस्तर माहिती अशी की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवसभर बंद ठेवून मुख्याध्यापक गैरहजर असल्याचे दिसून आल्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी शाळेला दिवसभरासाठी कुलूप असल्याचे गटशिक्षणधिकारी गंगाखेड तसेच केंद्र प्रमुख यांना माहीती कळवली असता सदरील घटनेचा पंचनामा करून तो तात्काळ माझ्याकडे पाठवा चोकशी अंती दोषींवर कार्यवाही करण्यात येईल असे  सांगण्यात आले होते यावरून दुपारी 2 वाजता उपस्थित असलेल्या पालक व ग्रामस्थांनी पंचनामा केला पंचनाम्यावर पांडुरंग बडवणे, मंगेश इमडे, अनंत पवार, मारोती गोरे, रामजी पवार,विठ्ठल पवार, सुधाकर पवार आदीच्या सह्या आहेत  याव...

परभणी लोकसभा : अंतर्गत नाराजीने शिवसेनेला बालेकिल्ल्यातच भगदाड

परभणी :  देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु होत आहे. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा  महासंवाद न्यूज घेत आहे परभणी. परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी सतत पाच वेळा शिवसेनेचा खासदार निवडून आलेला आहे. सध्या शिवसेनेचे संजय जाधव हे खासदार असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांचा पराभव केला होता. 2014 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव यांना 5 लाख 78 हजार 455 मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांना 4 लाख 51 हजार 300 मतं मिळाली. या निवडणुकीत संजय जाधव यांचा 1 लाख 27 हजार 155 मतांनी विजय झाला होता. मतदारसंघांचं समीकरण परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी परतू र आणि घनसावंगी हे दोन विधानसभा मतदारसंघ जालना जिल्ह्यात आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघ गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. येथे सध्या डॉक्टर राहुल पाटील हे आमदार आहेत. त्यांनी एमआयएमचे सज्जूलाला आणि भाजपचे आनंद भरोसे यांचा पराभव केला होता. गंगाखेड विधानसभा म...

इन्स्पेक्टर 22 लाख घेताना सापडला!

मुंबई (प्रतिनिधी)  स्वतःला नायक म्हणून घेणाऱ्या कोट्याधीश इन्स्पेक्टरला लाचलुचपत पथकाने लाच घेताना रंगेहाथ अटक केली. आनंद भोईर असं या पोलिसाचं नाव आहे. अटक इन्स्पेक्टर हा एका दारुच्या दुकान मालकाकडून 25 लाख रुपयांची लाच मागत होता. त्यातील 22 लाख रुपये घेताना त्याला अटक केली. महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत दाखल एका गुन्ह्यात फरार आरोपीला अटक न करण्यासाठी त्याने 25 लाखाची लाच मागितल्याचा आरोप आहे. आरोपी स्वत: कोट्यधीश आहे. मीरा भाईंदरमध्ये तो अनेक अनधिकृत कामं करत असल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. मात्र दुसऱ्यांना अटक करुन तुरुंगात टाकणारा पोलीस निरीक्षक स्वतःच तुरुंगात पोहोचला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, “आरोपी पोलिसाने दुसऱ्या प्रकरणात अटक झालेल्या एका आरोपीकडून बळजबरीने त्यांच्या मुलाचं नाव वदवून घेतलं. त्यानंतर अटक आरोपीसोबत त्यांच्या मुलाला बेड्या घालून, घर आणि दुकानाजवळ फिरवलं. त्यानंतर जर पैसे दिले नाही तर दुसऱ्या गुन्ह्यात अडकवू  अशी धमकी दिली” सध्या लाचलुचपत विभाग लाचखोर पोलिसाची कसून चौकशी करत आहे.

आज राणीसावरगांव सरपंचपदाची निवड...!सरपंचपदी सुरेश चव्हाण यांची वर्णी लागणार..!

राणीसावरगांव (प्रतिनिधी) गंगाखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या राणीसावरगांव येथील सरपंच सोमनाथ कुदमुळे यांच्यावर अविश्वस दाखल करण्यात आला होता सरपंच सोमनाथ कुदमुळे, यांनी अविश्ववासा विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते. यावर जिल्हाधिकारी परभणी यांनी गंगाखेड तहसीलदार यांचे म्हणने ऐकुन घेत सोमनाथ कुदमुळे यांच्या विरोधात निकाल दिला .निवडीची तारीख देऊन तात्काळ रिक्त पदावर निवड करा अश्या सुचना दिल्या होत्या यावरून दि.3 जानेवारी रोजी शहिद भगतसिंग सभागृहात नवनिर्वाचित सरपंचाची निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे यात सुरेश चव्हाण यांची वर्णी लागणार आहे या निवडीसाठी राणीसावगाव विकास आघाडीच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत यामध्ये पँनल प्रमुख मधुकरराव जाधव , सय्यद अल्ताफ , नारायण जाधव , ज्ञानेश्वर जाधव , प्रदीप जाधव , रमेश कुलकर्णी , बाबूभाई गुत्तेदर , ओंकार आंधळे , आदींच्या नेत्रत्वाखाली सरपंच सुरेश चव्हाण यांची निवड करण्यात येणार आहे
गंगाखेड नप पालिका सभागृहात नगराध्यक्ष व उप नगराध्यक्ष वाद विकोपाला .गंगाखेड.....प्रतिनिधी...नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष व.उपनगराध्यक्ष य दोघामध्ये स्व.गोपीनाथराव मुंढे अन्नछत्रालय मंजुरीच्या श्रेय लाटण्याच्या कारणावरुन शाब्दीक चकमक उडाल्याने हा वाद.विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका सभागृहामध्ये नगराध्यक्ष हे काँग्रेस आयचे असुन पालिका सभागृहात पक्षीय बलाबल बघीतले असता काँग्रेसचे आठ,राष्ट्रवादीचे सहा,भाजपाचे चार,सेनेचे दोन रासपाचे तीन व घनदाट मित्रमंडळाचे एक असे एकुन २४ नगरसेवक असुन सत्ता स्थापने वेळेस रासपाचे तीन,सेनेचे दोन,मित्र मंडळाचे एक असे बहुमत सिध्द केले होते.आज काँग्रेसचे नगराध्यक्ष विजयकुयार तापडिया व रासपाचे उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे असे सत्ता असुन गेल्या चार महिन्यापासुन सत्ताधारी.पक्षामध्ये अंतर्गत बंडाळी उडाली असुन नुकतेच संत जनाबाई मंदिराच्या बाजुस मंजुरी घेतल्याचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी संत जनाबाई मंदिराच्या बाजुस अन्नछत्रालय .लोकनेते गोपीनाथ मुंढे या नावाने मंजुरी घेतल्याचे प्रसिध्दी पत्रकात उपनगराध्यक्ष यांचे नाव न टाकल्याने उपनगराध्यक्...