मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाटोदा तालुक्यात स्टेट बँक कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या माहितीमुळे पीक कर्ज पुनर्गठन प्रस्ताव माघारी..!

*पाटोदा तालुक्यात स्टेट बँक कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या माहितीमुळे पीक कर्ज पुनर्गठन प्रस्ताव माघारी..! * पाटोदा.दि.३० (शेतकरी वार्ता). महाराष्ट्रातील दुष्काळाची धग मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली व गेल्या वर्षाच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यातील २१ लाख शेतकर्‍यांच्या ११ हजार कोटी रुपये कर्जाची फेररचना होईल. ज्या शेतकर्‍यांचे कर्ज थकले आहे त्यांचे पहिल्या वर्षाचे सगळे व्याज मायबाप सरकार भरणार आहे आणि पुढील चार वर्षांसाठी निम्मे म्हणजे सहा टक्के व्याज सरकार भरणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. यामुळे शेतकरी नव्याने कर्ज घेऊन शेती करू शकतो, अशी आहे गतवर्षीच्या सरकारची शेतकरी पीककर्ज पुनर्गठन योजना होती.      अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपालांच्या आदेशाने नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. परंतु, ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने, रब्बीच्या पेरण्यांसाठी पीक कर्जाचे पुनर्गठन अत्यंत गरजेचे आहे. किंबहुना, नैसर्गिक आपत्तीच्या काळात पीक कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांसाठी नव्याने कर्ज उपलब्ध करून देण्याचे स्...

प्रियांका रेड्डी हत्याप्रकरणी पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक खुलासा

हैदराबाद - हैदराबादमध्ये प्रियांका रेड्डी या २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवरबलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रियांका रेड्डी हत्याप्रकरणी पोस्ट मार्टम अहवालातून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी प्रियांकावर सामूहिक बलात्कार केला, त्यावेळी जवळपास 7 तास प्रियांकाला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत प्रियांकावर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियांकाला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून ट्रक ड्रायव्हरांसह त्यांच्या क्लिनर्सनी प्रियांकावर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं समजतंय. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानेही लक्ष घातले असून संबंधित अधिकाऱ्यांना हैदराबादला पाठविण्यात आलंय. प्रियांका शादनगर येथील आपल्या ...

पाटोद्याचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांचे स्वागत:- कॉ.महादेव नागरगोजे

*पाटोद्याचे तहसीलदार मा . रमेश मुंडलोड साहेब यांचे हार्दिक स्वागत.* :- कॉ . महादेव नागरगोजे पाटोदा ( *शेख महेशर* ):-  पाटोदा तालुक्यात गेल्या चार वर्षापासुन अत्यअल्प पावसामुळे तालुक्यातील जनतेला पाण्या अभावी अत्यंत वाईट दिवस काढावे लागले. आता परतीच्या पावसाने पाटोदा तालुक्यातील सिंचन तलावात चांगल्यापैकी पाणी साठा झालेला आहे. तालुक्यात दुष्काळात पाणी टंचाई जाणवते म्हणून तहसीलदार मुंडलोड साहेब यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व तालुक्यातील पाणी आरक्षित करण्याचे आदेश दिले. त्या मुळे भारतीय कम्युनिष्ट पक्ष व किसान सभेचे नेते यांनी मा. तहसीलदार साहेब यांना हार्दीक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. दि.२ नोव्हेंबर २०१९ रोजी आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार मा.श्री.बाळासाहेब आजबे काका हे निवडुन आल्यानंतर पाटोदा तहसील मध्ये तहसील सहीत सर्व अधिकारी विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते व जनप्रतिनिधीची बैठक घेऊन तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान भरपाई, लाईट, आरोग्य सेवा व खरीप २०१९ चा पिक विमा पाणी इत्यादी प्रश्नावर सांगोपांग चर्चा ह...

एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर रायगड जिल्ह्यातील रसायनीजवळ स्विफ्ट डिझायर कार आणि गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आहे. त्यात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.हा अपघात नेमका कशामुळं झाला हे कळू शकलेलं नाही. अपघातग्रस्त स्विफ्ट डिझायर कार (एमएच ११ सीएच १८८९) सजविण्यात आली होती. त्यामुळं ही कार एखाद्या लग्न सोहळ्यासाठी चालली असावी, असा अंदाज आहे. भरधाव असलेल्या या कारनं मागच्या बाजूनं टँकरला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अर्ध्या कारचा अक्षरश: चुराडा झाला. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी आहेत. स्थानिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ऊसतोड मजुराच्या मुलाने केलेले संक्षिप्त प्रश्न व त्यांची मोजकी उत्तरं."

*आले वाटतंय बीड बार्शीचे नगरे..!*   "ऊसतोड मजुराच्या मुलाने केलेले संक्षिप्त प्रश्न व त्यांची मोजकी उत्तरं."        उच्चशिक्षित व उच्चभ्रू लोकांच्या *नगरी*   हा शब्द लवकर लक्षात येणार नाही,पण मराठवाडा, खानदेश, विदर्भातील बिनकामाच्या रिकामटेकड्या पोरांना जरी विचारलं ना ते लगेच मोठं वर्णन करून सांगतं ते खालीलप्रमाणे.... *त्यांना गावाकडं पक्की घर असतात का..?*              नगरी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी पट्टयातील लोकांनी बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना, हिंगोली, गडचिरोली, आदिवासी भागातील जे लोक सध्या १०पत्र्याच्या घरापासून ते ४-५लाखांच्या स्लॅपच्या घरामध्ये राहणारी ही लोक असतात. *त्यांना स्वतःची शेती असते का..?*        घरी पोटापुरती म्हणजे २ एकर रापासून ती १२-१३  एकरांवर शेती असते, रब्बीच्या पिकाचे म्हणजे सोयाबीन, उडीद, मुग, बाजरी या पिकांचे ५ हजारांपासून ते १लाख५० हजारांवर यांचं उत्पन्न या लोकांना वर्षकाठी निघते..! *त्यांचे मुलं शिक्षण घेतात का..?*     ...

पाटोदा भारतीय बौध्द महासभेच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा

*पाटोदा भारतीय बौध्द महासभेच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा .*  पाटोदा ( प्रतिनिधी ) पाटोदा येथे भीमनगर मध्ये भारतीय बौध्द महासभा शाखा पाटोदा च्या वतीने संविधान गौरव दिना निमित्त जेष्ठ नागरिक दे.मा. गुरुजी सेवा निवृत्त शिक्षक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन विद्यार्थ्यांना संविधान गौरव दिना निमित्त सविस्तर असे मार्गदर्शन केले. या निमित्ताने लहान विद्यार्थीनी किरण जावळे हिने “ संविधानाचं पुस्तक हातात, भिमराव बसले रथात" असे संविधानावर सुंदर गित सादर करुन उपस्थितांचे मने जिंकले. भारतीय संविधानामुळे आपल्या देशातील सर्व सामान्य , उपेक्षित समाजाला जगण्याचा अधिकार मिळाला असून आज आपण सर्व जन सुखसोई युक्त जीवन जगत आहोत. संविधानामुळे आज आमच्या अंगावर कपडे आहेत आम्ही सोन्याचा घास खात आहोत सर्व क्षेत्रा मध्ये स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. या वेळी संविधान गौरव दिनास आर. बी. जावळे, निलेश जावळे, संजय जावळे, प्रा. विजय जावळे, शांताबाई जावळे, विमल जावळे, शितल जावळे, आश्विनी जावळे, हे उपस्थित होते. या वेळी बौध्दाचार्य आयु. धम्मनंद जावळे यांनी संविधान उद्...

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई :  उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पदभार घेण्यापूर्वीच अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मॅरेथॉन भेटी घेत, अजित पवारांना पुन्हा राष्ट्रवादीतच ठेवण्यात यश मिळवलं आहे. सर्व दिग्गजांनी भेटी घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांची भेट अजित पवारांसाठी निर्णायक ठरली. सदानंद सुळे यांनी आज सकाळी हॉटेल ट्रायडंटमध्ये अजित पवारांची भेट घेऊन, त्यांचं मन वळवलं. अखेर 23 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांनी 3 दिवसात पदभार न स्वीकारताच राजीनामा दिला. सदानंद सुळेंच्या भेटीनंतर अजित पवार थेट वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांनी आपला राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. अजित पवारांचा राजीनामा हा भाजपसाठी मोठा धक्का तर राष्ट्रवादीसाठी तितकाच मोठा दिलासा आहे. राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना जवळपास 5 वेळा अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी अजित पवारांची भेट घेऊन मन वळवण्याचा प्रय...

संत जनाबाई विद्यालयात संविधान दिन साजरा

संत जनाबाई विद्यालयात संविधान दिन साजरा

उद्याच्या उद्या लाईव्ह बहुमत घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. उदा पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी पूर्ण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या मतदानाचे लाइव्ह टेलिकास्ट करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. बहुमतासाठी घेण्यात येणारे मतदान हे गुप्त पद्धतीने न घेता ते थेट घेण्यात यावे तसेच या मतदानाचे लाइव्ह टेलिकास्ट करण्यात यावे असंही न्यायलयाने स्पष्ट केलं आहे. संबंधित निकाल देताना न्यायलयाने बहुमत चाचणीसाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून आमदारांना शपथ देण्याचे आदेश दिले आहेत. लोकशाही मूल्यांचं संरक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार असून, न्यायालयाला काही आदेश देणं गरजेचे आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या (२७ नोव्हेंबर) पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च ...

पाटोदा तालुक्यातील युवकांचा लगन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पाटोदा तालुक्यातील युवकांचा, लग्न. चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ... किशोर काकडे पाटोदा प्रतिनिधी ➡️ , दि .  ) : पाटोदा तालुक्यातीलडेंगरकिन्ही पासून अगदी जवळच असलेले खेडेगाव नाळवंडी येथील अर्जुन गुजर दिग्दर्शित लगन चित्रपटाची सुरुवात झाली चित्रपटाच्या विचाराचे नक्की कोणती गोष्ट करताना त्याला काहीतरी कारण आता लागतं पण ते कारण काही विशिष्ट असले तरच सत्य होईल असे नाही त्याची आवड जिद्द चिकाटी आणि मेहनत असेल तर ते साध्य होते नाळवंडी चे युवकांनी यापूर्वी लघु चित्रपटाच्या माध्यमातून आपली ओळख केलेली आहे त्याच युवकांनी गेल्या अनेक वर्षापासून मेहनत घेऊन एकआगळावेगळा मराठी सिनेमा लगन चित्रपट बनवला असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत त्या अगोदर चित्रपटाचं पोस्टर लॉच झालं असून या पोस्टरची गेल्यात आठवडा दोन आठवड्यात पासून सोशल मीडियावर सिनेमाच्या टायटल बरून जोरदार चर्चा रंगली आहे आणि नकीच लगन चित्रपट हा प्रेक्षकांना नवी पर्वणीच ठरेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही फेसबुक इंस्टाग्राम च्या पेजवर सिनेमाचे टायटल पोस्टर आणि एकच चर्चा आबंदा कोण कोण करणार ? तुमचं झालं का लगन ? अशी...

राष्ट्रवादीत फूट पडायची नसेल तर भाजपला साथ द्या :अजित पवार यांची मागणी

मुंबई, 23 नोव्हेंबर : राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीचे 3 दिग्गज नेते त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. अजित पवार यांची परत घरवापसी करण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे तीन नेते अजित पवार हे थांबलेल्या ब्राइटन इमारत इथं गेले. यावेळी सर्व नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. मात्र अजित पवार आपल्या निर्णयावर ठाम असून त्यांनी आमदारांच्या मार्फत शरद पवारांना एक निरोप पाठवल्याची माहिती आहे.'राष्ट्रवादीत फूट पडून द्यायची नसेल तर पक्षाने भाजपला पाठिंबा द्यावा,' असा निरोप अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासाठी पाठवल्याचं कळतंय. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यांना यश आलं नसल्याचं दिसत आहे.दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातून बंड करत भाजपला पाठिंबा दिला. या पाठिंबाच्या जोरावर भाजपच्या देवेंद्र फडणव...

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, अजित पवार उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार, अशी चिन्हं असताना शनिवारी सकाळी देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची पसंती उद्धव ठाकरे यांच्या नावाला होती. काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास तयार आहेत. शिवसेनेच्या आमदारांनीही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत यासंदर्भातला प्रस्ताव मांडण्यात आला. राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची बैठक मुंबईतील नेहरू सेंटर इथे झाली. बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले, "अजून चर्चा सुरू आहे. आम्ही असं ठरवलं आहे की कोणतीही गोष्ट अनुत्तरित ठेवायची नाही. अनेक मुद्यांवर एकमत झालं आहे. थोडे बारकावे शिल्लक आहेत. मला अर्धवट माहिती द्यायची नाही. एकत्र पत्रकार परिषद घेऊन घोषणा करू." राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हण...

बदली मान्यता आदेशाच्य प्रतीमुळे गोंधळ"तीन महिन्या पासुन शिक्षकांचा पगार बंद

गंगाखेड़:- तालुक्यातील मौजे मरडसगांव येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत बळीराज विद्यालयातील सर्व कार्मचारी यांना कार्यल्याच्या चुकीमुळे विनाकारण मागील तीन महिन्यापासुन वेतन मिळत नसल्याने ओढ़ावलेल्या आर्थिक अडचनीचा सामना करवा लागत आहे. याबाबत सविस्तर वृत असे की,कलाध्यपक श्री मुंढे एस.एल. हे श्री रेणुकादेवी विद्यालय राणिसावर ता.गंगाखेड़ जि.परभणी येथून संस्था अंतर्गत बदली होऊन मरड़सगांव येथील बळीराजा विद्यालयात रुजू झाले.त्यावेळी सौ.कांबळे या मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी मुंढे यांचा बदली मान्यतेचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी कार्यालयात दाखल केला व श्री मुंढे यांचा पगारही सुरु झाला. काही कालावधीतच सौ.कांबळे यांची संस्थे अंतर्गत राणिसावरगांव येथील शाखेवर बदली झाली व त्यांच्या जागेवर प्रभारी मुख्याध्यापक म्हणून श्री कोरडे ए.एम. यांची नियुक्ति झाली.ऑनलाइन प्रक्रिये साठी बदली मान्यतेची प्रत शोधली आसता, श्री मुंढे यांची बदली मान्यता प्रत आढळून आली नाही.आणि तेंव्हा पासुन हे प्रकरण उघड़े पडले. आणि गुंता अधिकच वाढला,संबधित कर्मच्याऱ्याची बदली मान्यता प्रत नसताना देखील संब...

नागराज मंजुळेंचा 'झुंड' ने केलं कॉपीराइट उल्लंघन

मुंबई : 'सैराट' चित्रपटाच्या माध्यमातून प्रचंड प्रसिद्धझोतात आलेले चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सध्या ते बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत आगामी 'झुंड' चित्रपटाच्या कामात  व्यस्त आहेत. परंतु त्यांचा 'झुंड' मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हैद्राबादमधील चित्रपट निर्माते नंदी कुमारने ‘झुंड’ चित्रपटाच्या निर्मात्यांना कॉपीराईट उल्लंघन केल्या प्रकरणी नोटीस पाठवली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते नागराज मंजुळे, टी सीरिजचे अध्यक्ष भूषण कुमार आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांना याप्रकरणी नोटिस पाठवण्यात आली आहे. कॉपीराईट उल्लंघन केल्या प्रकरणी कुमार यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाच्या या नोटीसला फक्त टी-सीरिजने उत्तर दिले आहे. पण त्यातून काही स्पष्ट होत नसल्याची भूमिका कुमार यांनी घेतली आहे. कुमार यांनी गेल्यावर्षी चित्रपटाच्या कथेची अधिकृतरित्या  तेलंगणा सिनेमा रायटर असोसिएशनकडे नोंद केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.परंतु चित्रपट निर्माते, अभिनेते आणि ज्यांच्या भोवती...

दिग्दर्शक शंकर भेंडेकर यांनी "पखवाज" वाजवत राम कृष्ण हरीच्या गजरात चित्रपटाचा शुभारंभ

राणीसावरगाव प्रतिनिधी गंगाखेड तालुक्यातील आरबुजवाडी येथे दिनांक 20 नोव्हेंबर रोजी पखवाज या चित्रपटाचा शुभारंभ चा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी पखवाज या चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर भेंडेकर निर्माता लिंबाजी मुंडे सिनेअभिनेते संदीप पाठक ऋतुजा धर्माधिकारी मयुरी आव्हाड दिग्दर्शक गोपी मुंडे आदींची उपस्थिती होती  पखवाज या चित्रपटाच्या शुभारंभप्रसंगी दिग्दर्शक शंकर भेंडेकर यांनी पखवाज वाजवत राम कृष्ण हरी च्या गजरात चित्रपटाचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात आरबुजवाडी येथे घेण्यात आला शुभारंभाच्या प्रथम पखवाज या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या संदीप पाठक यांना वृक्ष देऊन त्याचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित गावकऱ्यांना संबोधित करताना संदीप पाठक म्हणाले की या चित्रपटात वारकऱ्यांची परंपरा रीत रिवाज आणि पखवाज अवघ्या महाराष्ट्राने पहावा असा चित्रपट तयार करायचा आहे यासाठी आपले सहकार्य अपेक्षित असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले तसेच गावात शुभारंभाचा कार्यक्रम घेतला तुम्ही ज्या पद्धतीने आमचा सन्मान केला आणि त्याच पद्धतीने आम्हाला चित्रपट शूट करत असताना सहकार्य कराल अशी आशाही व्यक्त ...

प्रणिती शिंदे यांनी मागणी करताच जिल्हाधिकारी यांनी घेतली तातडीची बैठक.

डेंग्यूच्या साथीवर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना व्हावी याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीनुसार मा. जिल्हाधिकारी यांनी अधिकारयासमवेत घेतली तातडीची बैठक. सोलापूर : सोलापूर शहरामध्ये गेल्या एक महिन्यापासून डासांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शहरात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची तसेच डेंग्यूमुळे केतकी उडाणशिव (रा. दक्षिण सदर बझार), गौतमी देवसानी (रा. पद्म नगर) आणि यश वंगारी (रा. दाजी पेठ) यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पाश्र्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी आज सोमवार, दि. 18 नोव्हेंबर 2019 रोजी मा. जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाज्यांसमवेत तातडीने बौठकीचे आयोजन करण्याची मागणी केली होती. याअनुषंघाने मा. जिल्हाधिकारी यांनी तातडीने बौठक आयोजित केली. सदर बौठकीमध्ये सोलापूर महापालिकेकडून डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहिम राबवित सर्व प्रभागांमध्ये विशेष पथके तयार करावीत आणि या पथकांमार्फत खालील उपाययोजना करणे महत्वाचे असल्याची मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे केली : 1) तापाच्या रुग्णांचे सव्र्हे करणे. 2) ...

शिवसेनाप्रमुखाच्या विचार युवकांनी अंगीकरावे--विष्णू मुरकुटे

*शिवसेनाप्रमुखाच्या विचार युवकांनी अंगीकरावे--विष्णू मुरकुटे* गंगाखेड--खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुख नी मराठी माणसाला,बहुजन युवकांना ताठ मानेने उभारण्याची प्रेरणा दिले त्या मुळेच सर्वसामान्य युवक अनेक पदावर विराजमान झाले.सम्पूर्ण युवकांना निष्ठा,स्वाभिमान,प्रामाणिकपणा आणि अन्याय च्या विरोधात उभे राहण्याचे विचार दिले आहे त्या मुळे युवकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अंगिकररून उभे राहा असे प्रतिपादन उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांनी अभिवादन प्रसंगी केले.  -आज दिनांक 17 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दीना निमित्य उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या सम्पर्क कार्यालया मध्ये शिवसेनिकाच्या वतीने  अभिवादन करण्यात आले यावेळी जेष्ठ शिवसेनिक बालसाहेब पारवे,बाळासाहेब राखे यांनी शिवसेनाप्रमुख यांच्या आठवणीला उजाळा देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे की जय,अमर हे अमर हे जयघोष करण्यात आला जयघोषणांनी परिसर दनानुऊन गेला यावेळी उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे,महिलाउपजिल्हासघटक सुनीता घाडगे, संगीता जामगे, सूर्यमाला मोतीपवले,युवासेना ब्रिगेड प्रमुख संदीप र...

‘टिकटॉक’ वर भरला प्रेमाचा रंग ; मुलगी पहाताच प्रेमवीर झाला दंग

सध्या सगळीकडे ‘टिकटॉक’चा ट्रेंड आहे. अल्पावधीत प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण याचा वापर करतात. मात्र, याचा वापर केल्याने एक प्रेमवीर चक्क पोलीस ठाण्यात पोहचला आहे. ही घटना मुंबई आणि बनारसमधील आहे. ‘टिकटॉक’ वर एका मुलीचा व्हिडिओ आवडल्याने एका मुलाने तो लाइक केला. त्यानंतर ‘टिकटॉक’ लाइक करणे त्यांच्या आयुष्यात नवीन वळण घेऊन आले.मुंबईत राहणाऱ्या एका मुलीने स्वतःचा डान्सचा व्हिडीओ ‘टिकटॉक’ वर अपलोड केला होता. बनारसमध्ये राहणाऱ्या एका मुलाला ‘टिकटॉक’ व्हिडीओतील मुलगी खूप आवडली, व्हिडिओ बघितल्यापासून तो तिच्या प्रेमातच पडला. त्याने व्हिडिओला लाइक केले. त्यानंतर मुलीशी जवळीक वाढवण्यासाठी त्याने तिला दुसऱ्या सोशल मिडियावर इनव्हाइट केले. तिने त्याचे इनव्हिटेशन स्वीकारले आणि त्यांच्यात चॅटला सुरुवात झाली. या चॅटमुळे त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. सोशल मिडियावर प्रेमवीराने केलेल्या भूलथापांना मुलगी बळी पडली. त्यांच्यातील प्रेम फुलू लागले आणि मुलाला भेटण्याची आणि त्याची जीवनसाथी बनण्याची ओढ मुलीला लागली. त्यामुळे घरी कोणालाही न सांगता ती घरातून निघाली आणि थेट बनारस गाठले.बनारसजवळील मंडुवाड...

मला माझी मशीद परत पाहिजे : असदुद्दीन ओवेसी

 अयोध्या प्रकरणाचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. वादग्रस्त जागी राम मंदिर होईल असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तर मशिदीसाठी पर्यायी पाच एकरची जागा देण्याचाही निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. आता याबाबत एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मौन सोडलं आहे. त्यांनी आज एक ट्विट करत मला माझी मशीद परत हवी असं वादग्रस्त वक्तव्य काल केलं आहे.मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाप्रमाणेच मीसुद्धा या निकालाशी सहमत नाही. सुप्रीम कोर्ट ‘सुप्रीम’ असले तरी कोर्टाकडूनही चूक होऊ शकते, असे विधान ओवेसी यांनी केले होते. ज्यांनी बाबरी मशीद पाडली त्यांनाच ट्रस्ट बनवायला सांगून राम मंदिर उभारायला सांगण्यात आले आहे, असे नमूद करत जर आज मशीद उभी असती तर सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला असता?, असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला होता.सर्वोच्च न्यायालयाकडून ९ नोव्हेंबर रोजी रामजन्मभूमी वादग्रस्त जमीनप्रकरणी निर्णय देण्यात आल्यानंतरही ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाच्या निर्णयावर समाधानी नसल्याचंही ते म्हणाले होते. सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहेच परंतु तेदेखील चूकू शकतात. आमचा राज्यघटनेवर प...

“शेवंता जिती हाय !” या एका रहस्य प्रधान नाट्य प्रयोगाचे सादारीकरण (सिद्धार्थ मस्के)

दिनांक १६ नोव्हेंबर २०१९..... महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित, महाराष्ट्र राज्य हौशी मरठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला नांदेड केंद्रावर जेष्ठ रंगकर्मी लेखक, दिग्दर्शक डॉ. विलास भद्रे यांच्या हास्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ रंगकर्मी लक्ष्मण संगेवार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष संजीव कुलकर्णी, नाट्य प्रयोग परिनिरीक्षण मंडळ सदस्य राम चव्हाण, अ. भा. म. नाट्य परिषद शाखा नांदेडचे कार्यवाह गोविंद जोशी, तसेच परीक्षक प्रभाकर दुपारे- नागपूर, प्रमोद काकडे- पुणे, प्रकाश खोत- सोलापूर, यांच्या प्रमुख उपस्थिती नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन झाले. समन्वयक दिनेश कवडे, सह. समन्वयक किरण टाकळे कवडे, अमोल जैन यांनी मान्यवरांचे नाटकांवर आधारित पुस्तके देऊन मान्यवरांचे स्वागत केले. या प्रसंगी उद्घाटकिय भाषणात डॉ. विलास भद्रे यांनी स्पर्धेच्या बदलत्या रूपा बद्दल सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कोतूक केले. तसेच नांदेड केंद्रावरील मागच्या काही वर्षापासून वाढता प्रेक्षक वर्ग, संघांचे समाधान, सुयोग्य नियोजन याबद्दल स...

हॅशटॅग 'मी भाजपा सोडतोय' सोशल मिडियात चर्चा तर होणाराचं

मुंबई : विधानसभा निवडणुकीत आणि निकालानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन' हे वाक्य सोशल मिडियावर चांगलेच चर्चेत आले होते. तर राज्यात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियात आता, “मी भाजपा सोडतोय” हे हॅशटॅग चर्चेचा विषय बनला आहे. फेसबुकवर सकाळपासून ही पोस्ट मोठ्याप्रमाणावर पोस्ट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.राज्यात ज्या प्रमाणे राजकीय वातावरण तापले आहे, त्याचप्रमाणे सोशल मिडियावर सुद्धा सत्तास्थापनेचा मुद्यावर चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे राजकीय पोस्ट करताना अनेक हॅशटॅग वापरून ह्या पोस्ट केल्या जात आहे. मात्र कालपासून फेसबुकवर “मी_भाजपा_सोडतोय" हे हॅशटॅग मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देत असलेले कार्यकर्ते हा हॅशटॅग वापरत आहे.सद्याच्या परिस्थितीत भाजप नेते ज्याप्रमाणे वागत आहेत, हे सामान्य कार्यकर्त्यांना अजिबात आवडले नसल्याने मी भाजप सोडत असल्याचे या पोस्टमध्ये उल्लेख आहे. तर माजी पंतप्रधान व भाजपचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची भाजपा आता राहिली नसून भाजपच्या नीतिमत्ता सोडून चाललेल्या राजकारण...

बात सजदो की नही …tv 9 चे कार्यकारी संपादक माणिक मुंढे यांचा लेख

माणिक बालाजी मुंढे ………………… अंधेरीच्या कुठल्या तरी सिग्नलला ऑटो थांबलेला, मी डावीकडं बघितलं, एक कॉलेजवयीन पोरगी बाजुला शुन्यात बघत असलेली. आजुबाजुला वेस्टर्न एक्स्प्रेसवेची प्रचंड मोठी ट्राफिक. संथ गतीनं पुढं सरकणारी वाहानं, हॉर्नचा कर्कश आवाज, गाड्यांच्या काचावर टकटक करत भीक मागणारी लहान लहान पोरं, सिग्नल लागलंय म्हणताच मुंग्यासारखी एकमेकाला धडका देत जाणारी मुंबई. त्या पोरीला ह्या कशाचंच भान नव्हतं. एक भीकारी पोरगं तिच्या जवळ गेलं पण तिची कसलीच हालचाल नाही. नजर शुन्यात ती शुन्यातच. ती ह्या जगात नसावी. सिग्नल सुटलं आणि बिळातून उंदरं पळत सुटावीत तशी ट्राफिक सैरभैर झाली. मुंबईत मला अशी माणसं दिसली की भीती वाटते. थोड्याच वेळात आमचा ऑटो पुढच्या सिग्नलला थांबला, पुन्हा तशीच गर्दी, तशीच पोरं सगळं तसंच फक्त सिग्नल बदलला. मी पुन्हा इकडं तिकडं पहात होतो तर डाव्या बाजुला, अगदी मधात एक बाईकवाला सोडून तीच पोरगी, तशीच समोर शुन्यात पहाणारी. फरक फक्त एवढाच की आता तिच्या डोळ्यातल्या पाण्यानं वाट शोधलेली. तिचे अश्रू तिच्या गालावरून ओघळत खाली हातातल्या मोबाईलवर पडत होते. तिच्यासाठी हे जग धुसर झालं अस...

पत्रकारांना गुलाम समजण्याचा नेत्यांनी माज करू नये :-जयश्री खाडीलकर-पांडे

पत्रकारांना गुलाम समजण्याचा नेत्यांनी माज करू नये आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या समन्वय बैठकीची माहिती पत्रकारांना कळू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जो खालच्या पातळीचा हीन प्रकार केला त्याचा ‘नवाकाळ’ कडक शब्दांत निषेध करीत आहे. पत्रकार हे आपले गुलाम आहेत हे समजण्याचा माज नेत्यांनी करू नये. महाराष्ट्रात सरकार स्थापन होत नसल्याने शेतकर्‍यांपासून सर्वच हवालदिल आहेत, अशा स्थितीत सत्ता स्थापनेची प्रत्येक माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार रात्रंदिवस करीत आहेत. हे काम करताना ऊन असो, पाऊस असो, पोटात सकाळपासून एक कण अन्‍नाचा नाही तरी पत्रकार माहिती मिळविण्यासाठी  धावाधाव करीत आहेत. गेले 21 दिवस जीवाचे रान करीत आहेत आणि आज त्यांना फसविण्यासाठी अजित पवार चेहर्‍यावर संताप आणून बाहेर येत बैठक रद्द झाल्याचे सांगतात. अजित पवार उद्या येतील असे शरद पवार सांगतात. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सर्वच बैठक रद्द झाल्याचे सांगतात आणि मग लपून अज्ञातस्थळी जाऊन बैठक घेतात आणि आम्ही पत्रकारांची चेष्ट केली असे सांगतात हा काय प्रकार आहे? पत्रकारां...

रस्त्याच्या कढेला उभ्या ट्रकला बोलेरो जीप धडकली; ८ जण जागीच ठार, २ जण गंभीर जखमी:.

रस्त्याच्या कढेला उभ्या ट्रकला बोलेरो जीप धडकली; ८ जण जागीच ठार, २ जण गंभीर जखमी:. -घटनास्थळी रक्ताचा सडाच मृतांमध्ये दोन पोलीस,व वजन मापी अधिकाऱ्याचा समावेश पाटोदा (प्रतिनिधी )दि.११ मांजरसुंबा ते पाटोदा रोडवर वैद्यकिन्ही जवळ उभ्या ट्रकला बोलेरो जीप धडकून झालेल्या भीषण अपघातात बोलेरो गाडीतील सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी आहेत. मृतांमध्ये एका लहान बालकासह दोन पोलीस व एक वजन मापी अधिकाऱ्याचा आणि दोन महिलांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी ९:२५ च्या सुमारास हा अपघात झाला  दारू सोडविण्याचे औषध घेण्यासाठी बोलेरो गाडी क्र .MH-23 AS ,3470  मधून केज तालुक्यातील निवडुंगवाडी येथील हे लोक  बीड तालुक्यातील बेलखंडी येथे जात होते. मांजरसुंबा - पाटोदा रोडवर वैद्यकिन्ही जवळ आले असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रोडवर उभ्या ट्रकला मागच्या बाजूने धडकली. हा अपघात एवढा भीषण होता कि बोलेरो गाडीतील आठ जण जागीच ठार झाले. यात वैजिनाथ ज्ञानोबा तांदळे, केसरबाई बन्सी मुंडे, बाळू पंढरीनाथ मुंडे, अशोक मुंडे,आसराबाई भीमराव मुंडे व अन्य दोन हे जागीच ठार झाले आहेत. च...

राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांना भारतरत्न देण्याची होतेय मागणी, मोदींना एक लाख भाविक निवेदन पाठवणार

चाकूर : म.फुले,सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी होत असताना आता लातूर जिल्ह्यातून राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात मागणी होत आहे. या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवली जात असून, एक लाख भाविकांच्या स्वाक्षरीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविले जाणार आहे.देशासाठी सेवाकार्य करणाऱ्या व्यक्तीला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविण्यात येते. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे देशसेवेसाठी कार्य आहे. त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, समाजसेवा, राज्य उभारणीसाठी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून केलेले अतुलनीय कार्य आहे. वयाच्या 102 व्या वर्षीही हे कार्य अविरतपणे चालू आहे. वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस ही पदवी त्यांनी वर्ष 1945 मध्ये लाहोर विद्यापीठातून पूर्ण केली. देशाला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी सुरू झालेल्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.संत साहित्यांचे महान चिंतक म्हणून त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मागील 65 वर्षांपासून त्यांच्या ने...

राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा 'गेम'? राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांच्या भेटीला

मुंबई : भाजपाने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला 24 तासांची मुदत दिली होती. ही मुदत अपुरी असल्याने शिवसेनेने वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी त्यांची मागणी फेटाळून लावली. शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीनं दिवसभर मॅरेथॉन बैठकी घेतल्या. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दलचं कोणतंही पत्र दोन्ही पक्षांकडून देण्यात आलं नाही. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. आज संध्याकाळी शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यामध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचादेखील समावेश होता. आम्हाला राज्यपालांनी केवळ २४ तासांची वेळ दिली होती. त्यात आम्हाला दोन पक्षांची चर्चा करायची होती, असं आदित्य यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. आम्हाला 7.30 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती वेळ वाढवून देण्याची मागणी आम्ही केली. मात्र राज्यपालांनी वेळ नाकारली आहे. वेळ नाकारली तरीही दावा नाकारलेला नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. काँग्रेस राष्ट्रवादीनं शिवस...