मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वगृही परतण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सूचना जारी

 : लॉकडाउनमध्ये विविध राज्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय विद्यार्थी, मजूर, भाविकांसह अन्य लोकांचा घरी जाण्याचा मार्ग केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी मोकळा केला आहे. राज्यांनी मार्गदर्शक तत्वे निश्चित करुनच अशा लोकांना घराकडे पाठवावे असे आदेशित केले होते. त्यानुसार राज्य शासनाने 13 कलमी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. याची अंमजबजावणीचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. आदेशात म्हटल्याप्रमाणे, गृहमंत्रालयाने जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून निर्देश देण्यात येत आहेत. त्यानुसार लॉकडाउनमध्ये विविध राज्यात अडकून पडलेल्या व्यक्तींना स्वगृही पाठविण्यासाठी अथवा राज्यात आणण्यासाठी राज्यस्तरावर अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती एडजेस कुंदन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे राज्य संचालक अभय यावलकर हे नियंत्रक म्हणून काम पाहतील. त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील. जिल्ह्यांचे नोडल अधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील अडकलेल्या व्यक्तींची यादी त...

लॉकडाऊनच्या काळात दिव्यागांना प्रत्येकी दोन हजार रुपयाचे वाटप

 : शासनाने दिव्यांग व्यक्तीसाठी  विविध प्रकारच्या  मदतीला धावून जात आहे. भोकर नगरपरिषदेच्या मार्फत अनुदान देण्याबाबत आदेश  शासन स्तरावर दिले आहेत. याचाच भाग म्हणून शहराच्या हद्दीतील 174  दिव्यांगांना नगरपरिषद भोकरच्यावतीने वर्ष 2020-21 या चालु वर्षातील दिव्यांग व्यक्तींना निधीचे वाटप केले. 174 पैकी 104 लाभार्थीना बँक खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात आले. उर्वरितरित ज्या लाभार्थीकडे बँक खाते नाही अश्या 70 लाभार्थी ना घरपोच धनादेश प्रत्येकी 2 हजार रूपये  प्रमाणे असे एकुण तीन लाख 48 हजार रुपये दिव्यांग व्यक्तींना देण्यात आले आहेत. प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे त्यांच्या घरी जावुन सोशल डिस्टन्सींगचा वापर करित अनुदान वाटप केले. यासाठी नगरअध्यक्षा सौ. संगीता विनोद चिचांळकर, उपनगरअध्यक्षा जरीना बेगम शेख युसुफ, विनोद पाटील चिचांळकर, मुख्याधिकारी प्रीयंका ठोंगे, सामाजीक कार्यकर्ते शेख युसुफ  यांच्यासह सुनील कल्याणकर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, प्रकाश तोटलू कार्यालय अधीक्षक, अविनाश पेंडकर प्रशासकीय अधिकारी, रामसिंह लोध लेखापाल, कमलाकर भगत समुदाय संघटक, साहेब...

महात्मा फुल्यांना देशद्रोही म्हणणारे भिडे मोदी फडणविसांचे लाडके कसे?- प्रा. हरी नरके

साली मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा फुल्यांवर गरळ ओकले. सनातन प्रभातमध्ये बातमी आली की महात्मा फुले हे देशद्रोही होते असे भिडे म्हणाले. ही मुक्ताफळे प्रकाशित झाल्यानंतर मी काही लोकांशी बोललो. ओबीसी म्हणजे तमाम थंड आणि बत्थड लोक. कोणाचीच काहीही प्रतिक्रिया दिसली नाही. त्याच दिवशी मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरूषोत्तम खेडेकरांचा निवृत्तीसमारंभ होता.त्यांनी आग्रहाने बोलावले म्हणून मी गेलो. पुण्याच्या अल्पबचत भवनमध्ये निरोप समारंभ होता. कार्यक्रमाला त्यावेळचे शिक्षण मंत्री वसंत पुरके, [काँग्रेस] राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे, [राष्ट्रवादी] भाजपाचे पांडुरंग फुंडकर, आय.पी.एस. अधिकारी विश्वास नांगरे पाटील असे अनेक दिग्गज मंचावर उपस्थित होते. माझ्या भाषणात मी मनोहर भिड्यांच्या महात्मा फुले विषयक संतापजनक वक्तव्याचा ती बातमी सर्वांना दाखवून जाहीर निषेध केला. मात्र निरोपाच्या जल्लोशात त्यावर प्रतिक्रिया द्यायच्या मूडमध्ये कोणीही नव्हते. मी नंतरही अनेकांशी बोललो. उपयोग झाला नाही. एकहाती लिहित राहिलो. बोलत सुटलो. ज्यांच्या विरोधात बोलत-लिहित होतो त्या भिड्यांनी मात्र खुन्नस ठेवली बहु...

प्रयोगशाळा असलेले स्वारातीम हे भारतातील पहिले विद्यापीठ- पालकमंत्री अशोक चव्हाण

: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे नव्यानेच कोरोना नमुना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहे. या प्रयोगशाळेत एनएबीएल (नॅशनलअॅक्रेडीयशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) मूल्यांकन होऊन मिळवणारे हे भारतातील पहिलेच अकृषी विद्यापीठ आहे. या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. त्यांनी दि.२९ एप्रिल रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना स्वॅब नमुना तपासणी प्रयोगशाळेस भेट देऊन प्रयोगशाळेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनराव हंबर्डे, कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहकार्य मंडळाचे संचालक डॉ.राजाराम माने, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे, डॉ.शैलेश वाढेर, डॉ.दीपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोणत्याही प्रयोगशाळेसाठी...

न्या.दीपांकर दत्ता यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

न्या. दीपांकर दत्ता  यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ #मुंबई, दि. २८ | कोलकाता उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. मंगळवारी सायंकाळी (दि. २८) राजभवन येथे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी न्या. दीपांकर दत्ता  यांना पदाची शपथ दिली. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी न्या. दीपांकर दत्ता यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखविली. त्यानंतर राज्यपालांनी न्या. दत्ता यांना शपथ दिली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता राष्ट्रगीताने झाली. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) ठेवण्यासह योग्य खबरदारी घेण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, न्या. दत्ता यांचे कुटुंबीय, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, अतिरि...

औरंगाबादमध्ये सामूहिक नमाजासाठी जमलेल्यां नागरिकांनी केला पोलिसांवर हल्ला

औरंगाबाद {प्रतिनिधी }देशासह राज्यातही कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 95 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच शहरातील सर्व धार्मिक स्थळंही बंद ठेवण्यात आली आहेत. असं असूनदेखील औरंगाबादमध्ये काही लोक नमाज पठणासाठी एकत्र आले होते. यावेळी नमाजासाठी एकत्र आलेल्या लोकांना समजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणातील 27 हल्लेखोरांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर या हल्ल्यात 1 पोलीस आधिकारी, 2 कर्मचारी जखमी झाले आहेत.बिडकीन शहरातील संभाजीनगर मार्गावरील अमिरनगर-प्रकाश नगर येथे मुस्लिम समाजातील काही लोकं धार्मिक स्थळी सामुहिक नमाद पठणासाठी एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली. नागरिकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

शिवसेनेने सामनातून मोदी सरकार वर हल्लाबोल,..मोदींचा घेतला समाचार

मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि साखळी मोडून टाकण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. आता या निर्णयाला महिना होत आला आहे. कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. राज्याला मदतीची गरज आहे. मात्र, ही मदत करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक संकट गडद होत आहे. असे असताना काटकसर करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले. यात 'गावठी उपाय म्हणजे दात कोरुन देश चालविण्यासारखे आहे. अर्थव्यवस्थेचे कठोर उपाय म्हणजे जनतेच्याच आतड्यांना आणि खिशाला कात्री लावणे असेल, तर ते करण्यासाठी अर्थमंत्र्यांची गरज नसते,' असा हल्लाबोल शिवसेनेने आपल्या ' सामना'  या मुखपत्रातून केला आहे. देशातील सर्व अर्थमंत्र्यांशीही पंतप्रधान मोदी यांनी एकदा संवाद साधायला हवा. राज्यात काय स्थिती आहे, याचा आढावा घेणे गरजेचे आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी जनतेच्या नावे एक नवा संदेश दिला आहे. लोकच कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत, असे सांगून मोदी यांनी लोकांचे कौतुक केले आहे. भारतातील प्रत्येक नागरिक सैनिक बून लढाईत उतरला असल्याचे मोदी सा...

भाजप नीती गुल शरद पवार पावरफुल; उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदे वरील मार्ग मोकळा होणार..!

भाजप नीती गुल शरद पवार पावरफुल; उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदे वरील मार्ग मोकळा होणार..! मुंबई {प्रतिनिधी} राज्यावर करण्याचे महासंकट उभे टाकले आहे या संकटास तोंड देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा प्रश्न निर्माण झाला आहे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद जाईल की राहील अशी राजकीय चर्चा रंगली आहे याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही तर महा विकास आघाडी सरकार नवीन पावले उचलण्याच्या तयारीत आहे यापूर्वी 9 एप्रिल राजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याबाबत ठराव मंजूर झाला होता मात्र उपमुख्यमंत्रीपद ही वैधानिक पद नसल्याचे कारण पुढे करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हा ठराव ग्राह्य धरण्यास नकार दिला होता राज्य मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्र्यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्यता आहे या बैठकीत राज्यातील कोरोना संदर्भात आढावा तसेच संचारबंदी बाबत पुढे काय करणार यावर चर्चा होणार आहे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त...

पालघरमध्ये मॉब लिंचिंगची घटनेप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा !

मुंबई |  पालघरमध्ये मॉब लिंचिंगची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पालघरमधील गडचिंचले गावात घडली आहे. कायदा सुव्यवस्थेचा पूरता बोजवारा उडाला आहे, पालघरच्या हत्याकांडाने गृह खात्याची अब्रु वेशीवर टांगली गेली आहे, त्यामुळे या घटनेची नैतिक जवाबदारी स्विकारुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. सुशील गिरी महाराज, जयेश आणि नरेश येलगडे हे तिघे एका व्हॅनमधून सूरतमध्ये कुण्या एका व्यक्तीच्या अंत्यदर्शनासाठी जात होते. या तिघांपैकी एक जण कार चालवत होता. शेकडो ग्रामस्थांनी हल्ला केला पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक गावकऱ्यांनी चोर समजून या तिघांची गाडी थांबविली. सुरुवातीला त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि जेव्हा त्यांची गाडी थांबली तेव्हा तिघांना बाहेर काढून गावकऱ्यांनी त्यांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली.

पालघरमध्ये मॉब लिंचींग ; तीन महाराजांची हत्या

पालघरमधील मॉब लिचिंगची घटना धक्कादायक आणि अमानवी आहे.  या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून घटनेला कारणीभूत असलेल्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे आज केली आहे.पुणे/पालघर - पालघरमधील मॉब लिचिंगची घटना धक्कादायक आणि अमानवी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून घटनेला कारणीभूत असलेल्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे आज केली आहे.चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयावरून शुक्रवारी रात्री गडचिंचले येथे इक्कोने प्रवास करणाऱ्या तीन प्रवाश्यांची दगड, कोयते, कुऱ्हाडीने वार करून  हत्या केल्याप्रकरणी 110 आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी 9 आरोपी 18 वर्षांखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठविण्यात आले. तर अन्य 101 आरोपींना शनिवार, 18 एप्रिलला डहाणू कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांना 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्या करतेवेळी जमावात असलेले  काही आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत .घटनास्थळी गेलेल्या पोलिसांच्या गाडीवर ही जमवान...

अँकर,वेश्याव्यवसाय, पत्रकार अटक आणि प्रश्नचिन्ह ???

एबीपी माझाच्या पत्रकाराला इकडे अटक करण्यात आली आणि तिकडे रुबिका लियाकत सरळ झाली, अशा स्वरूपाच्या पोस्ट बघून गम्मत वाटली. पत्रकाराला अटक होणे योग्य नाही, अशा प्रकारची नाराजीही मोठ्या प्रमाणात व्यक्त झाली. ती सुद्धा गम्मतच आहे. त्यामागे एक प्रकारचा भाबडेपणा आहे. पत्रकाराला अटक होऊ नये, म्हणजे नेमके काय ? मग शिक्षकाला झाली तर चालेल का? डॉक्टरला झाली तर चालेल काय़ लेखकाला झाली तर चालेल का ? शेतकरी, मजूर आणि गरीब यांना तर केव्हाही झाली तरी चालेल, फक्त पत्रकारांना व्हायला नको, असे म्हणायचे आहे का ? मुळात आपण सर्वात आधी या समाजाचा घटक आहोत, देशाचे नागरिक आहोत आणि त्यानंतर आपल्या वेगवेगळ्या व्यावसायिक भूमिका येतात. त्यामुळे या देशातले सारे कायदे सर्वसामान्य परिस्थितीत सर्वांना सारखेच लागू होतात. व्हायलाच पाहिजेत. मग अमक्याला अटक होणे योग्य नाही, असा विषय कसा काय निर्माण होऊ शकतो ? खरं तर ती व्यक्ती कोण आहे, त्यापेक्षा त्या अटकेमागील कारण काय आहे? ते योग्य आहे का? परिस्थिती तशी आहे का आणि अटक करणारी एजन्सी प्रामाणिक आहे का? ह्या गोष्टींची खातरजमा करूनच आपण प्रतिक्रिया द्यायला हवी. पण कुलकर...

खासदार संजय जाधवांनी धान्याची साडे सहा हजार किट वाटल्या पण फोटोचा तामझाम कश्याला..!

परभणी :  लॉकडाऊनचा परिणाम सर्वसामान्य, गोरगरीबांच्या जीवनावर प्रचंड झाला आहे. या विदारक परिस्थितीत देणाऱ्यांचे हजारो हात समोर आले आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव यांनीदेखील परभणी व जालना जिल्हयात धान्याच्या तब्बल साडेसहा हजार किटचे वाटप केले आहे.सध्या लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या अनेक कटूंबासमोर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. घरातील कर्ता माणुसच घराच्या बाहेर पडू शकत नसल्याने घरात पैसा कसा येणार, हा प्रश्न रोजच्या कमाई करणाऱ्यासमोर उभा राहिला आहे. घरात पैसा नसल्याने धान्य आणने आवघड आहे. याची दखल घेत जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी तातडीने धान्याची व्यवस्था केली. अल्पावधीतच किराणा सामानाची यादी तयार करून एक महिना पुरेल इतके धान्य व आवश्यक किराणा साहित्याची किट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. केवळ परभणी शहरच नाही तर जिल्ह्यातील सर्व तालुके, ग्रामीण भाग व जालना जिल्ह्यात विस्तारलेल्या त्यांच्या मतदार संघातील गावांपर्यत त्यांच्या किटचे वाटप सुरु झाले आहे. दोन दिवसातच तब्बल साडेसहा हजार किटचे वाटप खासदार संजय जाधव यांच्या मार्फत करण्यात आले.  या संदर्भात बोलतांना खास...

ईडीने गुन्हे दाखल केलेले वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये क्वॉरंटाईन,मग मला वेगळा न्याय का?

मुंबई – कोरोनारोगाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लाॅकडाऊन असताना देखील मुंबईतील बांद्रा रेल्वे स्थानकावर आपल्या मुळगावी जाण्यासाठी परप्रांतीय मजुरांनी गर्दी केली होती.यावरून राज्यात चांगलेच राजकारण पेटले आहे.याच दरम्यान एबीपी माझा या मराठी वृतवाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या वार्तांकनामुळे वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी दिनांक 14 एप्रिल रोजी गर्दी जमा झाली असा आरोप ठेवत त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.आज वांद्रे सत्र न्यायालयाने राहुल कुलकर्णी यांना जामीन मंजूर केला आहे. यानंतर बोलतांना राहुल कुलकर्णी हे म्हणाले की,लोकांचे प्रश्न मांडणे हे आमचं कर्तव्य आहे.ते आम्ही मांडतचं राहणार.आमच्या बातमीमध्ये कुठल्याही स्टेशनचा उल्लेख नव्हता.तरी देखील तो जोडण्यात येऊन मला झालेली अटक ही चुकीची आहे.ज्या वाधवान कुटुंबीयांवर ईडीने गुन्हे दाखल केलेले आहेत.त्यांना महाबळेश्वरमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले आणि मला मात्र पोलिसांनी अटक केली,मग मला वेगळा न्याय का? असा खडा सवालही राहुल कुलकर्णी यांनी सरकारला विचारला आहे.

परभणीत कोरोनाचा पहिला पॉझीटीव्ह रुग्ण आढळला ; प्रशासन हायअर्लट

कोरोनाचा पहिला पॉझीटीव्ह रुग्ण आढळला शहरात मोठी अस्वस्थताः प्रशासन हायअर्लट प्रतिनिधी। परभणी गेल्या 15 दिवसांपुर्वी पुण्यातून परतलेल्या एका युवकास कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून याप्रकाराने जिल्हा प्रशासन अक्षरक्षः खडबडून जागे झाले आहे. लॉकडाऊन पहिल्या टप्प्यात 21 दिवस या जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असणारा एकही रुग्ण आढळला नाही. जिल्हा प्रशासनाने, आरोग्य विभागाने या संदर्भात कमालीची दक्षता बाळगली. परिणामी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.असे चित्र असतांना जिल्हा शासकीय रुग्णालयात संशयित म्हणून दाखल केलेल्या एका युवकास कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल गुरूवारी(दि.16) सकाळी ये़वून धडकला. त्यामुळे आरोग्य अधिका-यांसह महसुल व पोलिस प्रशासन कमालीचे हादरले आहेत. रुग्णालयात दाखल केलेल्या त्या युवकाने 15 दिवसांपुर्वीच परभणी गाठली होती. तो कुटुंबिया समवेत राहत होता. सर्दी, खोकलाच्या तक्रारीमुळे त्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्याचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा अहव...

बाबासाहेबांचे दैवतीकरण आणि आंबेडकरी समुहापुढील आव्हाने..{संजय रायबोले यांचा लेख}

आपल्या भारत देशाच्या पावन भुमीवर अनेक महापुरूषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे.त्यांच्या सेवेचा वारसा आजही आपल्याला प्रेरणादायक ठरला आहे. या थोर समाजसुधारकांमध्ये डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे विशेष स्थान असुन त्यांचे स्मरण म्हणुन त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात देश विदेशात साजरी केली जाते. नव्हे तर त्यांच्या जयंतीला ऊत्सवाचे स्वरूप आले आहे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मुख्य म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ह्यात असतानाच त्यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली अन सार्वत्रिक जयंतीची सुरूवात झाली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते.आज केवळ भारतातच नव्हे तर देश विदेशात देखील त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते ही आनंदाची बाब आहे. यावर्षी कोरोना वायरस अर्थात कोव्हीड-19 या सारख्या साथीच्या रोगाच्या सावटाखाली संपुर्ण जग सापडले असल्यामुळे आणि त्या रोगावर उपचार ही उपलब्ध नसल्याने भारतासह अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णांची संख्या ...

गरजू व्यक्तींना अन्नदान करताना सेल्फी किंवा फोटा काढल्यास तुरुंगात जाल

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरु असणाऱ्या लॉकडाउनदरम्यान अनेक हातावर पोट असणारे कामगार, मजूर वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. या मजूरांना अन्नदान करण्याचे काम अनेक सेवाभावी संस्था तसेच व्यक्तींच्या माध्यमातून केलं जात आहे. मात्र हे अन्नदान करताना गरजूंबरोबर फोटो काढून ते सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करणाऱ्यांचेही प्रमाण खूप आहे. अशाच लोकांविरोधात आता राजस्थान पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींचे आणि सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अनेक फोटो दिसून येत आहे. अडकून पडलेले मजूर, गरीबांना हे लोक अन्नधान्य तसेच जेवणाची पाकिटं वाटताना या फोटोमध्ये दिसून येत आहे. मात्र काही वेळा केवळ फोटो काढण्यासाठी आणि विशिष्ठ उद्देशाने अशा ठिकाणी लोकं जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. म्हणून राजस्थानमधील अजमेरचे जिल्हाधिकारी विश्वास मोहन शर्मा यांनी मदतकार्यादरम्यान फोटो काढण्यावर बंदी घातली आहे. गरजू लोकांना अन्नधान्य आणि जेवणाची पाकिटे वाटताना फोटो काढणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अ...

आव्हाडांना दिली हातपाय तोडायची धमकी; पोलिस अधिकारी सतिश कुलकर्णी हाजिर हो…!

अनंत करमुसे मारहाण प्रकरणानंतर आता शिवप्रतिष्ठान संघटना आणि भाजपाने मिळून आव्हाडांविरोधात समाजमाध्यमात जोरदार मोहिम सुरू केलीय. शिव्या, धमक्या अद्यापही सुरूच आहेत; पण यात लक्ष वेधून घेतलंय पोलिस अधिकारी सतिश कुलकर्णी यांनी ! आव्हाडांना हातपाय तोडायची धमकी कुलकर्णी यांनी दिल्याने आता आव्हाड समर्थकांनी कुलकर्णी यांच्याकडे मोर्चा वळवलाय. पुणे पोलिसांनी मात्र सतिश कुलकर्णी नावाचा अधिकारी आमच्याकडे नसल्याचं म्हटल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं आहे. सतिश कुलकर्णी या नावाचं फेसबुकवर अकाऊंट आहे व ते २०१६ पासून कार्यरत आहे. महाराष्ट्र पोलिसांत नोकरीत असून पुण्यात स्वारगेट पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक असल्याची सोबत माहिती आहे. सतिश कुलकर्णी नाव चर्चेत आलं, विकास भानुदासराव देशपांडे या फेसबुक युजरच्या आव्हाडांसंदर्भातील पोस्टवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे हिजड्यासारखा सरकारी यंत्रणेचा आसरा काय घेतो. एकट्याने लढायचं होतं, तुझे हातपाय तोडले असते, अशा आशयाची प्रतिक्रिया सतिश कुलकर्णी यांनी पोस्टरवर दिली आहे. एक पोलिस अधिकारी अशा प्रकारची प्रतिक्रिया कशी काय देऊ शकतो, अशी विचारणा करीत कित्येका...

राज्यात २५ लाख ८१ हजार ५९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप - अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

राज्यात २५ लाख ८१ हजार ५९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप - अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ #मुंबई, दि. ९ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. १ ते ८ एप्रिल २०२० या आठ दिवसात राज्यातील १ कोटी ४० हजार ८२२ शिधापत्रिका धारकांना २५ लाख ८१ हजार ५९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईही करण्यात येत आहे. ​ राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे.  या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने ...

भिकेमध्ये मिळालेल्या आमदारकीचा उपयोग महाराष्ट्रासाठी करा”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला

मुंबई :   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांची राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, याच मुद्द्याचा धागा पकडत भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “भिकेमध्ये मिळालेल्या आमदारकीचा उपयोग महाराष्ट्रासाठी करा”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे निलेश राणे नेमकं काय म्हणाले? “उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती असले तरी स्वत:साठी नशिबवान आहेत. त्यांना सगळं बसल्या-बसल्या मिळालं. आता आमदारकीदेखील राज्यपालांनी बसल्याठिकाणी दिली. भिकेमध्ये मिळालेल्या आमदारकीचा उपयोग महाराष्ट्रासाठी करा”, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली. निलेश राणे वारंवार शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. याअगोदरही त्यांनी अशाप्रकारची टीका केली आहे.

औरंगाबादमध्ये पोलिसांच्याच काठीने पोलिसांना मारहाण, तिघांना अटक, तीन आरोपी फरार

औरंगाबाद :  कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तरीही काही लोक आदेश न जुमानता बाहेर फिरताना दिसत आहेत. अशा लोकांवर पोलीस प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. अशातच आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णाभाऊ साठे चौकात पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असताना सहा गुंडांनी पोलिसांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला.  औरंगाबादमध्ये संचारबंदी असताना बाहेर फिरणाऱ्या सहा लोकांना पोलिसांनी हटकले असता त्यांनी पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलिसांची काठी हिसकावून घेऊन दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून तिघोजण अद्याप फरार आहेत. औरंगाबादच्या अण्णाभाऊ साठे चौकात ही घटना घडली. बाहेर बाईक घेऊन फिरणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी विचारणा केली. यावेळी पोलीस आणि आरोपी शेख फारुख, शे.शारुख शे.फारुख, शेख आरबाज शेख शमीम यांच्यासह अन्य तीन जणांची बाचाबाची झाली. यावेळी आरोपींनी पोलिसांच्या हातातली काठी घेऊन जनार्धन जाधव आणि दैनसिंग झोनवल या पोलीस कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. पोलिसांनी ट्...

'तुझा दाभोलकर होणार', कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांना धमकी

मुंबई, 8 एप्रिल :  तरुणाने केलेल्या मारहाणीच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड वादाच्य़ा भोवऱ्यात सापडले आहेत. जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदावरून हटवा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र एकीकडे हा वाद सुरू असतानाच आव्हाड यांना सोशल मीडियावरून थेट धमकी देण्यात आली आहे. तुझा दाभोलकर होणार,' अशी धमकी एका तरुणाने ट्विटरवरुन जितेंद्र आव्हाड यांना दिली आहे. काल झालेल्या मारहाण प्रकरणानंतर ही धमकी देण्यात आली आहे. एका कॅबिनेट मंत्र्यालाच अशा प्रकारे धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड काही लोकांच्या निशाण्यावर होते. त्यानंतर आता अशी उघड धमकी देण्यात आल्यानंतर याबाबत आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार, हे पाहावं लागेल

मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पहा पूर्ण मुद्दे

मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे #मुंबई, दि. 7 : आज कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे घेण्यात आली. वर्षा या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री सर्वश्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे हे मंत्री उपस्थित होते. मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेश टोपे, प्रा.वर्षा गायकवाड, डॉ. जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, ॲङ अनिल परब उपस्थित होते.  तर इतर मंत्री तसेच राज्यमंत्री आपापल्या जिल्ह्याहून या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत प्रारंभी कोरोना साथीला रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास तसेच मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये चाचणी सुविधा उपलब्ध करणे, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, अन्न धान्य पुरवठा, लॉकडाऊन, कम्युनिटी किचन यावर मंत्र्यांनी चर्चा करून सुचना केल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलद चाचणीची गरज ज...

जितेंद्र आव्हाडांविरोधात फेसबुक पोस्ट; शिवप्रतिष्ठाकनच्या कार्यकर्त्यांला मारहाण

जितेंद्र आव्हाडांविरोधात फेसबुक पोस्ट; अभियंत्याला बेदम मारहाणराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं एका अभियंत्याला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनंत कानमुसे असं या स्थापत्य अभियंत्याचं नाव असून आव्हाड यांच्या पोलीस शरीररक्षकांसह काही जणांनी त्यांच्या बंगल्यात नेऊन मारहाण केल्याचा आरोप त्यानं केला आहे. याबाबत वर्तकनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता देशवासीयांना दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यांच्या या व्हिडीओनंतर अनंत कानमुसे यानं त्यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यानंतर त्याच रात्री दोन गणवेशधारी आणि दोन विना गणवेशातील पोलिसांनी त्याला आव्हाड यांच्या बंगल्यावर नेलं. दरम्यान, त्यानं प्रश्न विचारला असता त्याला आव्हाडांच्या बंगल्यावर नेत असल्याचं सांगण्यात आलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर काही लोकांनी त्याला बेदम मारहाण केली....

सामुहिक जबाबदारीचे भान ठेवुन कोरोना आपत्ती मध्ये सर्वानी कामाला लागावे:जिल्हाधिकारी श्री.दि.म.मुगळीकर

परभणी, दि. 6 – जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, अधिकारी यांचा प्रशिक्षण वर्ग जिल्हाधिकारी श्री. दि.म.मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला. सुदैवाने जिल्हयात आज पर्यंत एकही रुग्ण कोरोना बाधीत झालेला नाही. भविष्यात जिल्हयात कोरोना बाधित रुग्ण होऊ नये याकरिता आपलाल्या कठोर आणि कडक उपाय अंगीकारावे लागतील असे श्री.मुगळीकर यांनी सांगितले. योवळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पृथ्वीराज बी.पी., निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी श्री.अरविंद लोखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, नोडल ऑफीसर जिल्हा रुग्णालय परभणी डॉ.किशोर सुरवसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रमेश खंदारे, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, जिल्हयातील सर्व महसुल अधिकारी आणि  डॉक्टर उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर पुढे बोलताना म्हणाले की, कोरोना बाधित रुग्णाची जागतिक, देशातील आणि राज्याची परिस्थिती पाहता कोणत्याही वेळी ...

धनंजय मुंडे झाले भावूक ….असं काय झालं बीड जिल्ह्यात?

बीड | जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांसह ३३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल काल (दि. ०६) सायंकाळी निगेटिव्ह आले आणि सबंध बीड जिल्ह्याने सुटकेचा निःश्वास टाकला. त्यानंतर सर्व जिल्हा वासीयांच्या प्रार्थना कामी आल्या अशी भावनिक पोस्ट जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या फेसबुकवरून केली आहे.कोरोनाच्या वैश्विक महामारीपुढे सबंध जग लढत आहे. आरोग्य विभाग, पोलीस आदी कर्मचारी दिवसरात्र धोका पत्करून कर्तव्य निभावत आहेत. त्यांना यावेळी कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका निर्माण होतो. बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड व अन्य कर्मचारी अशा ३३ जणांचे अहवाल आज चाचणीसाठी पाठवले होते. गेल्या अनेक दिवसंपासून एकही कोरोना रुग्ण नसलेल्या संपूर्ण बीड जिल्ह्याचे या चाचणी अहवालाकडे लक्ष लागुन होते. सायंकाळी ७ च्या सुमारास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याचे घोषित केले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.काहीवेळा कर्तव्यावर असताना पोलिसांना कठोर व्हावे लागते. अनेकांना ठिकठिकाणी पोलीसांनी काठीचा ‘प्रसाद’ही दिला, परंतु अशा प्रसाद खाल...

सांगली पोलिसांची कारवाई....सामूहिक नमाज पठण, ३६ जण ताब्यात

देशभरात लॉकडाउन जाहीर झालं असतानाही सामूहिक नमाज पठण करण्यासाठी एकत्र आलेल्या ३६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सांगलीमधील मिरजमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे. व्हॉट्सअपवरुन मेसेज करत सर्वांना नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जमण्यास सांगण्यात आलं होतं. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तिथे पोहोचून छापा टाकला आणि ३६ जणांना ताब्यात घेतलं. सर्वांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मिरजेतील मच्छी मार्केट येथे असणाऱ्या बरकत मशिदीत सामूहिक नमात पठण केलं जात होतं. यावेळी पोलिसांनी छापा टाकून ३६ जणांना ताब्यात घेतलं. डीवायसी संदीप सिंह गिल आणि पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी ही कारवाई केली. व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून सर्वांना नमाजासाठी बोलावण्यात आलं होतं. ताब्यात घेतलेल्या सर्व जणांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून कायदेशीर कारवाई केली जात आहे. सोबतच या सर्वांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला जात आहे. मौलवींच्या माध्मामातून त्यांना समजावलं जात आहे. माजी नगरसेवक साजीद अली पठाण हेदेखील तिथे उपस्थित आहेत.