मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शरद पवार 6 नोव्हेंबरला परभणी, हिंगोलीच्या दौऱ्यावर, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या बुधवारी 6 नोव्हेंबरला मराठवाड्याचा पाहणी दौरा करणार आहेत. यावेळी परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची ते करणार आहेत. शरद पवारांसोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे देखील असणार आहेत. यावर्षी परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.या दौर्‍यात शरद पवार परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. सर्वप्रथम परभणीतील सेलू तालुक्यातील काही भागांची त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील वसमत भागातील नुकसानीची पाहणी ते करणार आहेत.परतीच्या पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मराठवाड्यात गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, उडीद, बाजरीचं मोठं नुकसान झालं आहे. हाताला आलेली पिके काढण्याचे दिवस होते आणि तोच पावसाने जोरदार हजेरी लावली.विदर्भातील खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांचंही मोठे नुकसान झालं आहे. सोसाट्...

भाजपाकडून ‘गरज सरो वैद्य मरो’चा दुसरा अंक सुरु : शिवसेना

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यावर गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीचा दुसरा अंक सुरु झाला आहे. २०१४ मध्ये भाजपाने शिवसेनेसोबतची युती तोडली. २०१९ ला लोकसभा निवडणुकीच्या आधी युती केली मात्र आता गरज सरो आणि वैद्य मरोचा दुसरा अंक सुरु झाला आहे. पण इथे वैद्य मरणार नाही. त्याच्या जिभेखाली संजीवनी गुटिका आहे. ही संजीवनी म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आहे. अशा शब्दात शिवसेनेने भाजपाला फटकारले आहे. मुख्यमंत्री कोण होणार हा पेच सध्या महाराष्ट्रापुढे आहे कारण शिवसेनेने मुख्यमंत्रीपदामध्ये अर्धा वाटा मागितला आहे. त्यामुळे सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला खुमासदार शैलीत चिमटे काढण्यात आले आहेत. काय म्हटले आहे अग्रलेखात? महाराष्ट्राच्या राजकारणास चार दिशा आणि चार पाय फुटले आहेत. राज्याच्या हितासाठी हे बरे नाही. २४ तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. पण ३०-३१ तारीख उलटून गेली तरी सरकार स्थापनेच्या हालचाली नाहीत. युतीला जनादेश मिळूनही अधांतरी वातावरण निर्माण झाले आहे. या काळात काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी या पक्षांनी आपापल्या पक्षाचा विधीमंडळ नेता निवडला आहे. पण देशाचे लक्ष लागले...

आईची हत्या करुन मृतदेह घरात असतानाच तिने मित्राबरोबर ठेवले शरीरसंबंध

एकाहून अधिक मुलांबरोबर प्रेमसंबंध ठेवण्यास विरोध करणाऱ्या आईची एका १९ वर्षीय विद्यार्थिनीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. हयातनगर येथील द्वारका कॉलनीमध्ये राहणाऱ्या ३८ वर्षीय रंजीता यांची त्यांच्याच मुलीने हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर या मुलीने काही दिवस आईचा मृतदेह एका खोलीत लपून ठेवला. याच कालावधीमध्ये दोन दिवस त्या खोलीमध्येच तिने आणि प्रियकराने शरीरसंबंध ठेवल्याची माहिती समोर येत आहे. पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या किर्ती रेड्डी या तरुणीने आपला प्रियकर बाल रेड्डी आणि मित्र शशीच्या मदतीने आईची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. आईची हत्या केल्यानंतर या मुलीने आई बेपत्ता होण्यासाठी आपले वडील जबाबदार असल्याचा बनाव केला. आपले वडील आईचा छळ करायचे त्यांनीच तिचे बरेवाईट केल्याचा आरोप या मुलीने केला होता. मात्र पोलिस चौकशीमध्ये तिने आपला गुन्हा मान्य केल्यानंतर घटनाक्रम ऐकून पोलिसांनाच धक्का बसला. हत्या झालेल्या रंजीता यांचे पती श्रीनिवास हे लॉरी चालक आहेत. २४ ऑक्टोबर रोजी ते आपल्या घरी आले तेव्हा त्यांना दरवाजाला टाळं ...

वंचितची पुढील वाटचाल काय असणार.! प्रकाश आंबेडकर यांच्या लेखणीतून

ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या लेखणीतून.. ह्या पुढील वाटचाल ! लोकसभेच्या पाठोपाठ  विधानसभेच्या  निवडणूका झाल्या. लोकसभा निवडणुकीत यश आले नाही. तसेच विधानसभेतही  झाले. हे जरी खरे असले तरी राजकीय पक्ष, विचारवंत, समीक्षकांची, वंचितच्या नावाने दगडफोड चालूच आहे. वंचित एक नवीन इतिहास आणि मार्ग आखू इच्छीते. जो राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचा जातीयवादी (कुटुंबशाही जपणारा) आणि भाजपा धार्मिक पक्ष यांच्या राजकारणाला छेद देण्याचा प्रयत्न करते. ही वस्तूस्थिती आहे की वंचितकडे साधनं नाहीत. ती कदाचित साधनं असती तर सामाजिक बंधनं उलथून विजय प्राप्त झाला असता. निवडून आला म्हणजेच विजय प्राप्त होतो हा दिखावा आहे. या मापदंडाने आपण पाहिले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरसुद्धा पूर्णपणे हरले आहेत असच शिक्कामोर्तब कराव लागेल. जिथे जात आणि धर्म यांचे देशभावनेपेक्षा प्राबल्य आहेत तिथे आम्ही जे पेरतोय ते उगवायला वेळ लागणारच. लोकसभेनंतर विधानसभेला तो वेळ मिळाला असता तर कदाचित विजयाचा देखावा ही दिसला असता. ज्या पद्धतीने आमचे मित्रपक्ष वागले किंवा त्यांना वागायला लावले. त्यावरुन त्यांनी ‘वंचित’ य...

शिवसेनेला उपमुख्यमंत्री आणि १३ मंत्रिपदं-भाजपची ऑफर'

मुंबई: एकीकडे मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समसमान वाटपावरून शिवसेना अडून बसली असताना, भाजपनं आता शिवसेनेसमोर सत्तावाटपाचा प्रस्ताव मांडला आहे. यानुसार, मुख्यमंत्रिपदासह २६ मंत्रिपदं स्वत:साठी ठेवत, शिवसेनेला एक उपमुख्यमंत्रिपद आणि १३ अन्य मंत्रिपदं देण्याची तयारी भाजपनं दर्शवली आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्री पद, गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती देण्यात येणार नाहीत हे भाजपनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आज भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदार आणि नेते मंडळींनी विधीमंडळात येऊन देवेंद्र फडणवीस यांची गटनेते म्हणून निवड केली. यामुळे देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणार हे स्पष्ट झालं आहे. विधीमंडळ नेता निवडीनंतर आता शिवसेनेचा रागरंग बघून देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाचे नेते या नात्यानं सत्तास्थापनेचा दावा सादर करू शकतील.गेल्या २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप सर्वाधिक १०५ (नंतर आलेल्या ५ आमदारांसह ११०) आमदारांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. मात्र, सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या १४४ आमदारांची संख्या स्वबळ...

रामदास आठवले यांना मुख्यमंत्री करा :-जितेंद्र आव्हाड यांचा टोला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा भाजपा-शिवसेनेच्या महायुतीला पसंती दिली. गेल्या हंगामाच्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये घट झाली असली तरीही सत्ता स्थापनेची पहिली संधी ही महायुतीकडेच आहे. मात्र गेले काही दिवस शिवसेना-भाजपात सत्तास्थापनेवरुन सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. शिवसेना सत्तास्थापनेत ५०-५० च्या सुत्राप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी करत आहे. मात्र भाजपाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला कोणत्याही प्रकारे असा शब्द देण्यात आला नसल्याचं स्पष्ट केलं. या राजकीय नाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हान यांनी टोला लगावला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. शिवसेना-भाजपात सध्या सत्तास्थापनेवर नाट्य सुरु आहे. “दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचे पाय ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. या नाटकातून दोन्ही पक्षांचं चारित्र्य जनतेला कळत आहे. भाजपा-शिवसेनेची युती झालेली आहे त्यामुळे सत्ता स्थापन करणं त्यांची जबाबदारी आहे. सोमवारी शिवसेनेचा तर मंगळवारी भाजपाचा मुख्यमंत्री करा आणि राहिलेला रविवार आठवले साहेबांना मुख्यमंत्री ...

शेतकर्‍यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या - गणेश कवडे

*परतीच्या पावसामुळे सोयाबीन कापुस बाजरी नुकसान   तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या - गणेश कवडे* पाटोदा *(प्रतिनिधी )* पाटोदा तालुक्या तील गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे पाटोदा तालुक्यातील पारगाव, अमळनेर, डोगरकिन्ही,गटातील अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीच्या वतिने पाटोदा तहसिलला निवेदन देण्यात आले पाटोदा तालुक्यातील हाजारो एकरावरील पीक धोक्यात आले असल्याने बळीराजा संकटात सापडल्या आहे.पाटोदा तालुक्यात होणाऱ्या आवकाळी पाऊसामुळे शेतात पाणी साचल्यामुळे शेतातील मका, बाजरी, सोयाबीन, कपाशी, कांदे, कांद्याचे, रोप, टोमॅटो, भुईमूग इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतात उभ्या असलेल्या पिकांसोबतच काढून ठेवलेले पीक सुद्धा वाया गेले असल्याने शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी सण देखील साजरा करण्यात आला नाही दिवाळीच्या सणात पावसाने जोर धरल्यामुळे शेतातील तयार पिके काढता येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले सततच्या पावसा...

बहिणीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या भावाची निर्घृण हत्या

दिल्ली प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी घटना कैराना येथे घडली आहे. बहिणीची छेड काढणाऱ्यांना विरोध करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हा सर्व धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून मृत तरुणावर चाकूने हल्ला केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मृत तरुणाचे नाव विकी असून संबंधित घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली आणि या हल्ल्यात जखमी झालेला विकी २७ ऑक्टोबर रोजी सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मरण पावला. मिळालेल्या माहितीनुसार काही तरुण एका मुलीची सतत छेड काढायचे. सततच्या या त्रासाला कंटाळून संबंधित तरुणीने छेड काढणाऱ्यांची तक्रार आपल्या २२ वर्षीय भावाकडे केली. बहिणीची छेड काढणाऱ्यांना रंगेहाथ पकडून जाब विचारण्याचा निर्णय घेतला. विजय सिंग पाठक सरकारी पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विकीने अंजू नावाच्या तरुणाला बहिणीची छेड काढताना पकडले. त्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला. यावादाचे रुपांतर हणामारीमध्ये झाले. त्यावेळेस अंजूच्या काही मित्रांनी एकत्र येऊन विकीला बेदममारहाण केली. या मारहाणीमध्ये एकाने विकीच्या पोटात चाकू खुपसला. चा...

पोलीस कोठडीत तरुणाचा मृत्यू प्रकरणी: पाच पोलीस निलंबित

मुंबई  : वडाळा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या कस्टडीत एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी पाच पोलिसांना निलंबित केले आहे. विजय सिंह असं मृत तरुणाचे नाव आहे. अद्याप मृत्यू कशाने झाला हे अजून स्पष्ट झाले नाही. मृत विजय सिंह एका फार्मा कंपनीत काम करत होता. सोमावारी रात्री एका प्रेमी युगुलासोबत वाद झाल्याने जोडप्याने विजयला वडाळा पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर विजयच्या छातीत दुखू लागले. परंतु, पोलिसांनी केवळ नाटक करत असल्याचे बोलून दुर्लक्ष केले आणि मारहाण केली, असं सांगितलं जात आहे. यानंतर विजयची आई पोलीस स्टेशनमध्ये पोहचली. पण त्यांनाही भेटू दिले नाही. रात्री 2 वाजता विजय जमिनीवर कोसळला असता त्याला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर कुटुंबियांकडून तसेच विभागातली इतर लोकांकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांविरोधात मोर्चे काढण्यात आले. यामध्ये स्थानिक आमदार, खासदार यांनीही सहभाग घेऊन पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. वडा...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली (नांदेड रिपोर्टर रियाज आतार)

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानाची पहाणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली यावेळी विविध भागातील आढावा घेत भोकर मतदार संघातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानाची पहाणणी केली यावेळी शेतकऱ्या सोबत संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या झालेल्या नुकसानाची शासनाच्यावतीने नुकसान भरपाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी लावून धरली या प्रश्नावर उत्तर देताना चव्हाण म्हणाले की शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान कशा पद्धतीने म्हणून देता येईल हे सरकारने पाहून तात्काळ नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई  मिळवून देऊ अशी ग्वाही दिली

शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आमदार राजेश पवार यांनी केली पाहणी (नांदेड रिपोर्ट रियाज आतार)

नायगांव मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार मा.राजेश संभाजी पवार यांनी धर्माबाद तालुक्यातील आटाळा या गावातील काही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन परतीच्या पाऊसाच्या तडाख्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झालेल्या खरीब हंगामातील सोयाबीन आणि कापूस या पिकांची पाहणी केली. त्याच बरोबर इतर काही भागात जाऊन जिल्हा परिषद सदस्या सौ.पुनमताई राजेश पवार यांनी नायगांव तालुक्यातील मांजरम आणि कोलंबी या गावातील काही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन परतीच्या पाऊसाच्या तडाख्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झालेल्या खरीब हंगामातिल सोयाबीन आणि कापूस या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची हमी यावेळी त्यांनी दिली

जि.प अध्यक्ष शांतामाई पवार यांच्याकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी(नांदेड रिपोर्टर रियाज आतार)

 हादगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नासाडी झाली असून यासाठी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे याची भरपाई शासनाच्यावतीने होईल मात्र नांदेड जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई पवार जळगावकर यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी केली यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दिसून आले

कोठडीतील मृत्यू प्रकरण: वडाळ्यात तणाव; जमावावर लाठीचार्ज

कोठडीतील मृत्यू: वडाळ्यात तणाव; जमावावर लाठीचार्ज मुंबई: विजय सिंह या तरुणाच्या कोठडीतील मृत्यूला जबाबदार धरून वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकासह पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतरही तणाव कायम आहे. विजयच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर त्याचे कुटुंबीय व नातेवाईक ठाम असून संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत विजयवर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे. दरम्यान, वडाळा टी टी पोलीस स्टेशनबाहेर तणावाचे वातावरण असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. वडाळा टी टी पोलीस स्टेशन परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या भागात विजयचे कुटुंबीय, नातेवाईक व अन्य लोकांचा जमाव झाला असून काही नातेवाईकांनी बेस्टच्या एका बसलाही लक्ष्य केले आहे. बस अडवून बसवर दगडफेक करण्यात आली असून यात बसच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळेच तणावात अधिकच भर पडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विजयच्या मृत्यूला जे अधिकारी व पोलीस कारणीभूत आहेत त्यांना केव...

पावसात भिजावं लागतं, आमचा अनुभव कमी पडला : फडणवीसंचा शरद पवार यांना टोला

पावसात भिजावं लागतं, आमचा अनुभव थोडा कमी पडला असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शरद पवार यांना टोला लगावला आहे. शरद पवार यांनी साताऱ्यातली सभा घेतली तेव्हा पाऊस पडला. त्या पावसातही ते बोलत राहिले. मी लोकसभेच्या वेळी चूक केली होती ती सुधारा, मी मान्य करतो तेव्हा ती चूक करायला नको होती असं शरद पवार भाषणात म्हणाले होते. या भाषणानंतर सोशल मीडिया असो किंवा राज्यात असो अवघं वातावरणच बदलून गेलं. त्याचा परिणाम मतदानावरही झाला. आज वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी फराळासाठी पत्रकारांना बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार असाही दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागते आहे, मात्र असं काहीही ठरलेलं नाही. आम्ही फार आडमुठी भूमिका घेणार नाही. शिवसेनेसोबत चर्चा करणार आणि मेरिटनुसार जे काही आहे ते ठरणार असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मात्र त्याचवेळी पावसात भिजावं लागतं, त्याबाबत आमचा अनुभव कमी पडला असाही टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचं नाव न घेता ल...

‘सत्ता जाउद्या साहेब, या परिस्थितीमध्ये माझा शेतकरी जगणार कसा सांगा ?’

हिंगोली : ‘साहेब परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे’. कापून ठेवलेल्या सोयाबीन पिकांना कोंब फुटली या परिस्थितीत शेतकरी जगणार कसा त्यांना मदत मिळाली पाहिजे यासाठी विमा कंपन्यांकडे पाठपुरावा करा अशा सूचना आमदार संतोष बांगर यांनी दिल्या.परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतामध्ये गुडघ्या एवढया पाण्यामध्ये सोयाबीनच्या सुडया आहेत. तर कापून ठेवलेली सोयाबीन अस्ताव्यस्त पसरले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले असून या पिकांचे 50 टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.रविवारी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी तालुक्यातील देवजना, शेवाळा व इतर भागात भेट देऊन पाहणी केली.शेतात सोयाबीनची परिस्थिती पाहून आमदार बांगर यांचे डोळे पाणावले. जिल्ह्यातील प्रमुख पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीनची नुकसान झाल्याने नवीन भागाचे अर्थकारण कोलमडले. साहेब, या परिस्थितीमध्ये माझा शेतकरी जगणार कसा ? शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत आर्थिक मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू मात्र पिक विमा कंपन्यांकडे ही प्रशासनाने पाठपुरावा करून तातडीने पंचनामे ...

खा. प्रतापराव पाटील मोठ्या अपघातातून बचावले (नांदेड रिपोर्टर रियाज आतार)

खा. प्रतापराव पाटील  मोठ्या अपघातातून ब चावले !. हजारो लोकांअंतकरणातून 'आशीर्वाद 'या बळावर नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर एका मोठ्या प्रसंगातून आज बचावले.जॅके राखे साईंया मार सकेना कोई। आज अनुभवायला मिळाले. दिवाळीत हजारो लोकांच्या आशीर्वादाने प्रतापरावांचे प्राण वाचले बालाजी जाधव यांची प्रसंगसावधानता लक्षात घेऊन गाडीवर कंट्रोल करत हजारों लोकांच्या मनात घर करून असलेले खासदार प्रताप्राव चिखलीकर यांचे त्यांच्या ड्रायव्हरने प्राण वाचवले असेच म्हणावे लागेल       लोह्यातील व्यापाऱ्यांना दिवाळी’च्या शुभेच्छा देण्यासाठी खा. प्रतापराव पाटील मार्केट कमेटीला दिवाळी पाडव्याला येत असतात त्याच प्रमाणे आज दुपारी (२८ ऑक्टोबर २०१९ सोमवार रोजी येथील साईबाबाचे दर्शन घेऊन दोन’च्या सुमारास लोह्याकडे निघाले.डेरला फाट्याच्या जवळ आल्यानंतर ‘ नांदेड’कडे   एम एच २६- ७७४९ शंभरच्या स्पीड ने ट्रक येत होता. तो ट्रक  एक थेट खासदारांच्या गाडीवर आदळणार तेवढ्यात प्रसंगावधान राखून ड्रायव्हरने  आपले गाडी कंट्रोल करतात बाजूला घेतली आणि होणारा भीषण अपघ...

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करा:-माजी आमदार सुभाष साबणे (नांदेड रिपोर्टर रियाज आतार )

नांदेड (प्रतिनिधी) बिलोली तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यामध्ये शेतकर्‍यांच्या हाताला आलेले सोयाबीन,कापूस,तुर या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान  झाले आहे त्याचप्रमाणे नदी काठावरील खरडपट्टी व माती वाहुन गेलेल्या शेतीचे खूप साऱ्या चांगले आहे या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे माजी आमदार सुभाष साबणे यांच्या वतीने नायब तहसीलदार नरवाडे यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील विधानसभा मतदारसंघ संघटक अवधूत भारती शिवसेना देगलूर दक्षिण शहर प्रमुख सुनील नागशेट्टिवार माजी शहरप्रमुख व्यंकट पुरमवार शिवसेना उपशहरप्रमुख संजय जोशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यादव फिरंगे श्रीनिवास मंदीलवार बाबुराव मिनकीकर मारोतराव नाईक मनसक्करगेकर आदींची उपस्थिती होती

'मुस्लिम कोणाचंही ऐकणार नाहीत, ते जास्तीत जास्त मुलं जन्माला घालतील'

गुवाहाटी: दोनपेक्षा अधिक अपत्यं असणाऱ्यांना सरकारी नोकरी न देण्याचा निर्णय आसाम सरकारनं घेतला आहे. यावरुन ऑल इंडिया युनाइटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एआययूडीएफ) प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी आसाम सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. इस्लाम केवळ दोन मुलं जन्माला घालण्यावर विश्वास ठेवत नाही. ज्यांना या जगात यायचंय, त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असं अजमल यांनी म्हटलं आहे. आसाम सरकारनं काही दिवसांपूर्वीच दोनपेक्षा अधिक अपत्यं असणाऱ्यांना सरकारी नोकरी न देण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाष्य करताना अजमल यांनी मुस्लिमांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा, असं आवाहन केलं. 'आमच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसंही सरकार आम्हाला नोकऱ्या देत नाही. आम्हाला सरकारकडून तशी अपेक्षादेखील नाही. त्यामुळे मुस्लिमांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा. त्यांना चांगलं शिक्षण द्यावं. त्यामुळे ते प्रगती करतील आणि हिंदूंना नोकऱ्या देतील,' असं अजमल यांनी म्हटलं.शनिवारीदेखील अजमल यांनी अशाच प्रकारचं विधान केलं होतं. 'मुस्लिम समाज मुलं जन्माला घालत राहील. ते कोणाचंही ऐकणार नाहीत. या जगात जे येऊ ...

तर पंकजा मुंडें गंगाखेड विधानसभा लढवणार..!

मुंबई: विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांच्या पुर्नवसनासाठी स्थानिक पातळीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी दोन आमदारांनी पंकजा यांच्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. जेणेकरून पंकजा मुंडे यांना पुन्हा विधानसभेवर निवडून आणता येईल. त्यासाठी पाथर्डी मतदारसंघातील भाजपच्या आमदार मोनिका राजीव राजळे यांच्या पाठोपाठ गंगाखेड मतदारसंघातील रासपचे रत्नाकर गुट्टे यांनीही पंकजा मुंडे यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देऊन जागा सोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे.परळीतून पंकजा यांना निवडून आणण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी पंकजा यांच्या प्रचारासाठी सभाही घेतल्या होत्या. मात्र, धनंजय मुंडे यांनी पंकजांचा ३० हजारांपेक्षाही अधिकच्या मताधिक्य़ाने पराभव केला होता. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पंकजा यांचा पराभव झाल्याने भाजपची अनेक राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाथर्डी आणि गंगखेडपैकी एका मतदारसंघात पोटनिवडणूक घेऊन पंकजा यांना पुन्हा विधानसभेवर पाठवाव...

मुस्लिम शेजारी दिवाळी साजरी करु देत नाही, अभिनेत्याची मोदींकडे तक्रार

अभिनेता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या मालकीच्या एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये काम करणारा अभिनेता विश्वा भानू सध्या चर्चेत आहे. सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी केली जात असताना भानू यांना वेगळ्याच प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. मी राहत असलेल्या मुस्लिम सोसायटीमधील रहिवासी दिवाळी साजरी करण्यास मज्जाव करत असल्याची तक्रार भानूंनी केली आहे. ट्विटरद्वारे विश्वा भानू यांनी याबाबत तक्रार केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केलंय."मी मुंबईच्या मालवणी परिसरातील एका मुस्लिम सोसायटीमध्ये राहतो. पण गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सोसायटीतील रहिवाशांनी माझ्या पत्नीला घराबाहेर रांगोळी काढण्यापासून व दिवे लावण्यापासून रोखलं. घर सजवण्यावरुन माझ्याशी व पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी बळजबरीने दिव्यांची नासधूस केली आणि रोषणाई देखील काढून टाकली", असं ट्विट भानू यांनी केलं आहे. गेल्या वर्षीही दिवाळी साजरी करु दिली नव्हती असं देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलंय. तर, दुसऱ्या एका ट्विटमध्ये, "मी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार केली असून पोलिसांनीच मला याबाबत ट्व...

मेघना बोर्डीकर वर्षा वर...डॉ. पाटील मातोश्रीवर!! वरपुडकर थेट बांधाबांधावर

मेघना बोर्डीकर वर्षा वर...डॉ. पाटील मातोश्रीवर!! वरपुडकर थेट बांधाबांधावर!!! परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांनी भेटीगाठी वर भर दिला....... परभणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी थेट मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटी घेतल्या त्याच वेळेला राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची त्यांनी भेट घेतली... आज मुंबईत वर्षा निवासस्थानी _देवेंद्र_फडणवीसभेट घेतली. जिंतूर-सेलू ची आमदार या नात्याने मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मतदार संघाच्या वतीनं दिवाळी निमित्त शुभेच्छा देतानाच जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण_विषयांवर त्यांचेशी चर्चा झाली..पावसामुळं जिल्हयात झालेल्या शेतीच्या नुकसानीची माहीतीही  दिली. संपुर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या पाठीशी सरकार खंबीरपणानं ऊभं राहणार असल्याची ग्वाही यावेळी  त्यांनी दिली ... पाथरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी मात्र थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेटीगाठी सुरू केल...

मुके यांच्या मुत्युने पंचक्रोशीत शोककळा (मारेगांव सचिन मेश्राम)

केळापुर तालुक्यातील उमरी येथे कर्तव्य पार पाडुन मारेगांवकडे दुचाकीने येणाऱ्या जमादारास भरधाव इंधन टँकरने जबर धडक देत चिरडले. यात जमादाराचा करून अंत झाल्याची दुर्दैवी घटना मारेगांव राज्य महामार्गावरील इसार पेट्रोल पंप वळणावर शनिवारी सकाळी साडेदहा वाजताचे दरम्यान घडली.ऐन सनासुदीच्या काळात काळाने घाला घातल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.             मधुकर निळकंठराव मुके (५२) असे अपघातात मुत्युमुखी पडलेल्या जमादाराचे नाव असुन ते वणी तालुक्यातील मेंढोली येथील मुळ रहिवासी होते सन २०१५ मध्ये मारेगांव पोलीस स्टेशनला रुजु झाल्यानंतर गत चार महिन्यापुर्वी यवतमाळ पोलीस मुख्यालयातून त्याना केळापुर तालुक्यातील उमरी पोलीस चौकीवर डेप्युटेशनवर .देण्यात आले रात्री पाळी चे कर्तव्य पार पाडल्यानंतर मारेगांव येथे कुटुंब वास्तव्यात असल्याने दुचाकीने ते मारेगांवकडे निघाले. करणवाडी समोर आल्यागत मागावून भरधाव वेगाने इंधन टँकरने समोरील मुके यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक बेतालवस्थेत चालविणाऱ्या टँकर चालकाच्या लक्षात आली नसल्याने भरधाव टँकर परत डाव्या बाजूला असलेल्या इ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: 'ताईंना खोटं जमलं नाही...' पराभवानंतर पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट !

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार धनंजय मुंडे पंकजा मुंडेंचा पराभव करत जायंट किलर ठरले. राज्यातील हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघात अखेर भावाने बाजी मारली. परळीतून धनंजय मुंडे यांना 1,21,555 एवढी मतं मिळाली असून, पंकजा मुंडेंना 91,031 मतांवर समाधान मानावं लागलं. धनंजय मुंडेंनी जवळपास 30,524 मताधिक्यानं पंकजा मुंडेंचा पराभव केला. पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पंकजा यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना अनाकलनीय असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्टही टाकली आहे. या पोस्टमध्ये पंकजा मुंडेंनी पराभव स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे. फेसबुक पोस्टमध्ये त्या लिहितात, मी माझा पराभव मान्य केला असून मी लागलीच माध्यमातूनही त्याचा स्वीकार केला आहे. असं सर्व का झालं यावर मी चिंतन करेन लोकांना जाऊन भेटेनही. आता या विषयाला सर्वांनी विराम द्यावा..कोणी कोणावर आरोप करू नये, जबाबदारी ढकलू नये, निवांत आपली दिवाळी कुटुंबा समवेत साजरी करावी. राजकारणात सर्वेसर्वा असतात मतदार, त्यांचा निर्णय अंतिम असतो. तो योग्य का अयोग्य यात चर्चा नसतेच. तो अंतिम असतो बस्स!!, ज्यांनी मतदान केलेल...

मतमोजणीवर उमेदवारांनी घेतला आक्षेप प्रचंड गोंधळ (प्रतिनिधी:-सचीन मेश्राम)

मतमोजणीवर उमेदवारांनी घेतला आक्षेप प्रचंड गोंधळ प्रतिनि धी. सचीन मेश्राम. वणी.यवतमाळ वणी. वणी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना 12व्या फेरीअंती काही उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर शंका घेत प्रत्येक मतदान यंत्राची फेर मतमोजणी करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केल्याने चागलाच गोंधळ उडाला.. भाजपचे उमेदवार संजीव रेड्डी बोदकुरवर यांना पहिल्या फेरी पासून आखेरपर्यत आघाडी मिळाली उर्वरीत उमेदवारांना मात्र अनपेक्षित अशी मते पडली त्यामुळे 12व्या फेरीअंत मनसेचे राजु उंबरकर अपक्ष संजय देरकर, विश्वास नांदेकर, काँग्रेस चे वामनराव कासावार, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे आदिनी आक्षेप घेतला. मतमोजणी संशयास्पद असल्यामुळे प्रत्येक मतदान यंत्राची फेरमोजणी घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ .शरद जावळे यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली. या उमेदवारा मध्ये यावेळी प्रचंड रोष  होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी व उमेदवारामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली.परिणामी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतमोजणी नंतर आक्षेप अर्जाच...

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी महसुल, कृषी, विमा कंपनी कडे संयुक्त पंचनाम्याचा आग्रह धरावा:- भाई विष्णुपंत घोलप

*पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी महसुल, कृषी, विमा कंपनी कडे संयुक्त पंचनाम्याचा आग्रह धरावा.* :- भाई विष्णुपंत घोलप पाटोदा ( प्रतिनिधी ) गेल्या आठवडाभरातील अचानक आलेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन सह इतर सर्व पिकांचे अंतोनात नुकसान झालेले असुन त्या साठी शेतकऱ्यांनी शासनाकडे लेखी निवेदन किंवा अर्ज देऊन आपणाला विमा किंवा अनुदान मिळण्यासाठी महसुल, कृषी आणि विमा कंपनी कडे संयुक्त पंचनामा करण्यासाठी आग्रह धरावा असे आवाहन भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे शेतकऱ्यांना केले आहे.  पावसाळयाचे संपुर्ण दिवस टंचाई व थोडया फार पावसावर गेलेले असताना सोयाबीन, बाजरी, मका, तीळ व इतर पिकांची काढणी चालु असताना कापुस, कांदा, तुर व भाजीपाला या पिकांना आठवडाभरातील सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले असुन त्या शेतकऱ्यांना शासनाकडुन अनुदान किंवा शेतकऱ्यांनी पिकाच्या झालेले नुकसानीचे १०० टक्के विमा मिळावा म्हणून पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे महसुल, कृषी,आणि विमा कंपनी असा संयुक्त पंचनामा करण्...

मुख्यमंत्रीपद हवं का उपमुख्यमंत्रीपद? भुजबळांची शिवसेनेला ऑफर

येवला : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद पाहिजे की मुख्यमंत्रिपद हे त्यांनी ठरवायचं असल्याचं सूचक वक्तव्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. विजय जल्लोषानंतर भुजबळ येवल्यात पत्रकारांशी बोलत होते. राज्यातल्या निवडणूक निकालात स्पष्ट बहुमत कोणालाच मिळालेलं नाही. त्यामुळे काहीही घडू शकतं, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून भुजबळ चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत.विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेने वेगळा विचार केला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला तर भाजपला सत्तेपासून लांब राहावं लागू शकतं. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं ही काँग्रेस पक्षाची प्राथमिकता असेल, असं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं होतं.तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक कार्टून ट्विटरवर शेअर केलं आहे. या कार्टूनमध्ये वाघाच्या हातात कमळ आणि गळ्यात घड्याळ दाखवण्यात आलं आहे. संजय राऊतांनी हाच फोटो ट्विट करत व्यंगचित्रकाराची कमाल...बुरा न मानो दि...

बुलढाणा अर्बन तर्फे सभासदाच्या वारसास धनादेश वितरण

बुलढाणा अर्बन तर्फे सभासदाच्या वारसास धनादेश वितरण -----------------------//////-------------------  राणीसावरगाव (प्रतिनिधी) पालम तालुक्यातील सदगीरवाडी येथील वैजनाथ किशनराव गुट्टे यांचा दिनांक 21 एप्रिल 2019 रोजी इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू झाला त्यांनी बुलढाणा अर्बन शाखा राणीसावरगाव येथे दिनांक 9 मार्च 2019 रोजी रुपये 14,000 सोनेतारण कर्ज घेतले होते सभासदाच्या अपघाताची माहिती मिळताच शाखा व्यवस्थापक श्री संजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या सर्व कागदपत्राची पूर्तता करुन विभागीय व्यवस्थापक यांच्या मार्फत मुख्यालयास सादर केले व त्यांच्या वारसास श्री नागिनबाई वैजनाथ गुट्टे यांना संस्थेमार्फत अपघाती विमा मंजूर करून घेतला असल्याची माहिती दिली आणि तो अपघाती विमा आज दि 15 ऑक्टोबर रोजी बँकेत कार्यक्रम आयोजित करून 14266 रकमेचा चेक वाटप करण्यात आला यावेळी संस्थेचे विभागीय व्यवस्थापक श्रीकांत जोशी, यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक शाखा सल्लागार सिद्धेश्वर सालमोठे, मधुकर जाधव नारायण कदम डॉ.परशुराम शिंदे,अमोल धुळे, इंद्रजीत कदम व शाखा व्यवस्थापक संजय शिंदे यांच्या हस्ते धनादेशाचे वाट...